शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
6
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
7
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
8
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
9
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
10
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
11
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
12
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
13
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
14
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
15
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
16
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
18
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
19
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
20
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट

चटपटीत, पण तितकेच गलिच्छ; नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना चाप बसवा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2023 9:37 AM

अशा वेळी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालविल्याबद्दल संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांवरच गुन्हे दाखल केल्याशिवाय ही यंत्रणा सुधारणार नाही.

मिलिंद बेल्हे, सहयाेगी संपादक

अंडरवेअरवर बसून जमिनीवर पाणीपुरीच्या पुऱ्या लाटण्याचा मीरा-भाईंदरमधील व्हिडीओ व्हायरल झाला आणि गलिच्छ वातावरणातील अन्नपदार्थांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. अन्न आणि औषध भेसळ प्रतिबंधक विभागाचे (एफडीए) वाभाडे काढले गेले. यापूर्वीचा पायाने पाणीपुरीचे पीठ मळण्याचा व्हिडीओ असेल, पिंपात पाणी भरून त्यात चड्डीवर उभे राहून गाजरे धुण्याचा विषय असेल, सांडपाणी वापरून रेल्वेस्थानकात धुतली जाणारी फळे असोत की गटारात पडलेली फळे गोळा करून तशीच विकण्याचा प्रकार असो, दरवेळी त्यावर फक्त चर्चा झाली. पण कधी कोणावर कारवाई झाली नाही. हे अन्नपदार्थ बनवणारे शौचास जातात, लघवीला जातात, त्यातील अनेकांना त्वचारोग असतात; पण त्यांच्या आरोग्याची-स्वच्छतेची कधी चर्चा होत नाही. 

अनेकदा दुकानांत, रस्त्यावर, रेल्वेगाड्यांत घरगुती पदार्थ मिळतात, पण त्यावर ना बनवल्याची तारीख असते, ना ते पदार्थ कधी खराब होतील (एक्स्पायरी डेट) त्याचा उल्लेख. मिठाई २४ तासांत संपवावी, असे छापण्याच्या बंधनाचे असेच तीनतेरा वाजविण्यात आले. मिठाईत वापरले जाणारे दुय्यम दर्जाचे घटक, आरोग्यास अपायकारक रंग हेही कधी कोणी तपासत नाही. लस्सी, सरबते, खरवस यांचीही तशीच कथा.

खाद्यपदार्थ बनविणाऱ्या ठिकाणी कोणते तेल वापरले जाते, किती वेळा त्याचा पुनर्वापर होतो, पदार्थात वापरल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचा दर्जा, जागेची स्वच्छता, कामगारांचे आरोग्य, तेथे वापरले जाणारे पाणी, भांडी घासून धुण्यापेक्षा विसळून वेळ मारून नेण्याचा उद्योग यावरून आरडाओरडा झाला की आमच्याकडे मनुष्यबळ कमी असल्याचे सांगून एफडीएचे अधिकारी हात वर करतात. निचे दुकान, उप्पर मकान अशा अवस्थेत स्थानकातच संसार थाटणाऱ्या स्टॉलबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही पाहणीचे फक्त आदेश काढले. पण नंतर सारे आपोआप शांत झाले.  मग याची जबाबदारी कोणाची? अशा वेळी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालविल्याबद्दल संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांवरच गुन्हे दाखल केल्याशिवाय ही यंत्रणा सुधारणार नाही. अन्यथा असे गलिच्छ व्हिडीओ येत राहतील.