शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याला महिला मुख्यमंत्री हव्या पण रश्मी ठाकरेंचं नाव नको; किशोरी पेडणेकर असं का बोलल्या?
2
...तर २ टर्म मी केंद्रात मंत्री असतो; मुख्यमंत्रिपदावरून नाना पटोलेंचं थेट उत्तर
3
Ganesh Visarjan 2024 Live: किनाऱ्यावर भाविकांची गर्दी; 'लालबागचा राजा'चं समुद्राकडे मार्गक्रमण
4
"तुम्ही प्रश्न विचारू शकता, वाद घालू नका"; मणिपूरच्या प्रश्नावर अमित शाहांचा पत्रकाराला सल्ला
5
"दादांनी थांबवलं तरी भाजपाविरोधात निवडणूक लढणार"; अजित पवार गटातील नेत्याचा इशारा
6
नवाब मलिक यांच्या जावयाच्या कारचा भीषण अपघात; समीर खान गंभीर जखमी
7
NPS Vatsalya Scheme: मुलांचं पेन्शन अकाऊंट, वर्षाला करू शकता ₹१००० पासून गुंतवणूक; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
पेजर हॅक झाले की मोसादने कंपन्यांसोबत डील केली; लेबनॉन बॉम्बस्फोटानंतर प्रश्न उपस्थित
9
EPFO News : EPFO मध्ये मोठ्या बदलाचे सरकारचे संकेत, फायदा होणार की नुकसान? पाहा संपूर्ण डिटेल्स
10
सूरजला ओळखता येईना पाणगेंडा, अंकिताला विचारतो दिसतो कसा? टास्कदरम्यानचा व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू
11
आजचे राशीभविष्य, १८ सप्टेंबर २०२४; खूप मोठा आर्थिक लाभ होईल, यश व कीर्ती वाढेल
12
ममता बॅनर्जी यांना कोर्टाने फटकारले! महिला डॉक्टरांना नाईट शिफ्टपासून रोखू नका
13
देशभरातील बुलडोझर कारवाईवर बंदी, आमच्या आदेशाशिवाय बांधकामे पाडू नका: सर्वोच्च न्यायालय
14
राजधानीत 'आतिशी 'बाजी, केजरीवाल यांचा राजीनामा; आतिशी मार्लेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री होणार
15
मोहना सिंगची 'गगनचुंबी' झेप! बनली तेजस फायटर फ्लीटमधील पहिली महिला फायटर पायलट
16
'दगडूशेठ'च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात; भाविकांची झुंबड
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी; दुखापतग्रस्त हाताने खेळलेला 'डायमंड लीग'
18
अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जना करण्यासाठी गेलेले दोन कर्मचारी पूर्णा नदीपात्रात गेले वाहून
19
हातगाडी लावण्यावरून चाकू हल्ल्यात एकाचा खून; कोल्हापूरच्या आराम कॉर्नर येथील घटना
20
जळगाव जामोदमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, तरुण जखमी; पोलिसांचा हस्तक्षेप

फराळ झाल्यावर तळलेले तेल बरेच उरले तर काय करायचे?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 11:41 AM

दिवाळीचा फराळ करून झाला, पदार्थ तळून झाले की एक प्रश्न कायमच असतो, तो म्हणजे उरलेल्या तेलाचं काय करायचं?

- मंजिरी कुलकर्णी

दिवाळीचा फराळ करून झाला, पदार्थ तळून झाले की एक प्रश्न कायमच असतो, तो म्हणजे उरलेल्या तेलाचं काय करायचं? कुणी म्हणतं ते तेल भाजीआमटीला वापरून टाकावे, कुणी त्यातच पुन्हा पुन्हा पदार्थ तळते, कुणी ते तेल न खाता सरळ फेकून देते. यातलं खरं-खोटं काय? तळलेल्या तेलाचं नेमकं करायचं काय? आणि मुळात म्हणजे एकदा पदार्थ तळलेले तेल पुन्हा पुन्हा वापरावे का?

तर त्या प्रश्नांचं एकच उत्तर, की एकदा आपण ज्यात पदार्थ तळला, ते तेल उरलं तर ते तेल अजिबात वापरू नये. असे पुन्हा पुन्हा गरम केलेले तेल आरोग्यासाठी अतिशय घातक असू शकते. त्यामुळे तळताना अंदाजाने मापात तेल घ्यावे, कारण उरलेले तेल टाकून देणं जीवावर येणं साहजिकच आहे. मात्र आरोग्याचा विचार करता एकच तेल पुन्हा पुन्हा गरम करून पदार्थ तळणे हे हिताचे नाही.

तळलेले तेल पुन्हा पुन्हा का वापरू नये?>> तळलेले तेल पुन्हा पुन्हा वापरणे आरोग्यासाठी अतिशय हानीकारक असू शकते. त्या तेलाच्या पुनर्वापराने कॅन्सरसह अनेक घातक आजार होण्याची शक्यता असते.>> पुन्हा पुन्हा तळलेले तेल वापरल्याने खराब कोलेस्टेरॉल वाढते.>> पुन्हा पुन्हा गरम केलेल्या तेलात कॅन्सर कॉजिंग एजंट, पॉलिसायकलिक अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन म्हणतात, ते हानीकारक घटक असतात. त्यानं कर्करोग होण्याचा धोका बळावतो.>> अनेकदा गरम केल्यानं तेलात विषारी प्रक्रिया सुरु होते.>> त्यातले चांगले घटक कमी होतात.>> म्हणून पुन्हा पुन्हा तळलेले तेल आरोग्याला अतिशय हानीकारक असते. ते वापरू नये.

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :foodअन्न