शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

क्रोएशियाने लोकांची मने जिंकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 23:39 IST

एक महिन्याच्या थरारानंतर फ्रान्सच्या रूपाने आपल्याला फिफा विश्वचषकाचा विजेता मिळाला.

- अयाझ मेमनएक महिन्याच्या थरारानंतर फ्रान्सच्या रूपाने आपल्याला फिफा विश्वचषकाचा विजेता मिळाला. त्यांनी अंतिम सामन्यात क्रोएशियाचा ४-२ असा पाडाव केला. खेळामध्ये आपल्याला नेहमी असे बघायला मिळते की एक संघ सामना जिंकतो, तर दुसरा संघ सर्वांचे मन जिंकतो आणि क्रोएशियाने नेमकी अशीच कामगिरी केली. त्यांना अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी त्यांची कामगिरी जबरदस्त होती. अंतिम सामन्यात त्यांच्याकडून काही चुकाही झाल्या. तरी फ्रान्सच्या खेळाचेही कौतुक करावे लागेल. फ्रान्सच्या पोग्बा, ग्रीझमन आणि एमबाप्पे या तिन्ही स्टार खेळाडूंनी गोल केले. यामुळे या तिघांचाही भाव चांगलाच उंचावेल. आकडेवारीवर नजर टाकल्यास हा सामना एकतर्फी झाल्याचे दिसत नाही. क्रोएशियाने चेंडूवर ६१% नियंत्रण राखले, तर फ्रान्सने ३९%. पण असे असले तरी चेंडूवर नियंत्रण राखणाराच जिंकतो असे नसते.फ्रान्स फुटबॉलमधील एक महासत्ता आहे हे मान्य करावे लागेल. दुसरीकडे क्रोएशिया त्या तुलनेत खूप लहान देश आहे. या सामन्यात दोन्ही देशांच्या राष्ट्रपतींनी ज्याप्रकारे सामन्याचा आनंद घेतला ते शानदार होते. तुम्ही देशाचे प्रमुख असाल तरीही क्रीडा स्पर्धांत सहभागी होऊ शकता हे या दोन्ही नेत्यांनी दाखवून दिले आणि असे झालेही पाहिजे. कारण यामुळे खेळाची प्रगती होईल.दुसरीकडे, क्रिकेटमध्ये भारत-इंग्लंड संघ निर्णायक एकदिवसीय सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने भारताला मोठ्या फरकाने नमविले. धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा खेळ पाहून मला काहीसा धक्का बसला. महेंद्रसिंग धोनीसारख्या आक्रमक फलंदाजाकडून झालेली संथ खेळी अनपेक्षित होती. इंग्लंडसाठी हुकमी खेळाडू जो रुटने झळकावलेले शतक दिलासादायक आहे. शिवाय तीनशे धावांचा पाठलाग करताना एक वेगळी मानसिक तयारीही करावी लागते. पहिला सामना मोठ्या फरकाने गमावल्यानंतर इंग्लंडने दुसºया सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले.भारतीय गोलंदाजांमध्ये चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवने ३ बळी घेतले असले, तरी तो काहीसा महागडा ठरला आहे. त्याने इंग्लंडच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना बाद केले असल्याने अजूनही इंग्लंडला कुलदीपची गोलंदाजी समजून घेण्यात अडचण येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. लेगस्पिनर युझवेंद्र चहल याने फार बळी घेतले नसले, तरी त्याने धावा रोखण्यात योगदान दिले. वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलच्या अनुभवाची कमतरता दिसून आली. उमेश यादवही महागडा ठरला. त्यामुळे मंगळवारचा निर्णायक सामना जिंकणे दोन्ही संघांना अनिवार्य आहे.

(संपादकीय सल्लागार)