शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

४३ वर्षांनंतर मिळाले यजमानपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 05:02 IST

फुटबॉल : २०२२ मध्ये भारतात होणार महिला आशिया चषकाचे आयोजन

नवी दिल्ली : आशियाई फुटबॉल परिसंघाने १९७९ नंतर प्रथमच भारताला २०२२ च्या आशियाई महिला फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद सोपविले आहे. एएफसी महिला फुटबॉल समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. फेब्रुवारीत ही शिफारस करण्यात आली होती.अ.भा. फुटबॉल महासंघाला पाठविलेल्या एका पत्रात एएफसी महासचिव दाटो विडसर जॉन म्हणाले, ‘२०२२ च्या आशिया चषक महिला फुटबॉलचे यजमानपद भारताला सोपविले आहे.’ स्पर्धेत १२ संघ सहभागी होतील. भारत यजमान असल्याने थेट सहभागी होईल. ही स्पर्धा २०२३ च्या फिफा महिला विश्वचषकाची पात्रता फेरी देखील असेल.भारतात पुढच्यावर्षी १७ वर्षांखालील महिला विश्वचषकाचे देखील आयोजन होणार आहे. (वृत्तसंस्था)‘२०२२ च्या आशिया चषक महिला फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भूषविण्यायोग्य समजल्यामुळे मी आशियाई फुटबॉल परिसंघाचा आभारी आहे. ही स्पर्धा महत्त्वाकांक्षी महिला फुटबॉलपटूंना प्रेरणा देणारी ठरेल. भारतात महिला फुटबॉलमध्ये सामाजिक क्रांती आणणारी ही स्पर्धा असेल.’-प्रफुल्ल पटेल, अध्यक्ष, एआयएफएफ