शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

भारतीय खेळाडूंची कठीण परीक्षा, अखेरचा साखळी सामना : माजी विजेत्या घानाविरुद्ध आज लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 00:37 IST

पहिल्यांदाच १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळत असलेल्या भारताच्या युवा संघाने सर्वांची मने जिंकली असून, गुरुवारी ‘अ’ गटात भारतीय संघ आपला अखेरचा सामना माजी विजेत्या घानाविरुद्ध खेळेल.

नवी दिल्ली : पहिल्यांदाच १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळत असलेल्या भारताच्या युवा संघाने सर्वांची मने जिंकली असून, गुरुवारी ‘अ’ गटात भारतीय संघ आपला अखेरचा सामना माजी विजेत्या घानाविरुद्ध खेळेल. घानासारख्या कसलेल्या संघाविरुद्ध भारताच्या युवा खेळाडूंची कठीण परीक्षा होईल.स्पर्धेतील सलामीच्या लढतीत अमेरिकाविरुद्ध ०-३ असा पराभव पत्करावा लागल्यानंतर भारताच्या युवा संघाने कोलंबियाविरुद्ध जबरदस्त झुंज दिली. कोलंबियाविरुद्ध शानदार खेळ करताना भारतीयांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या सामन्यातही पराभव झाला असला, तरी भारतीय युवा खेळाडूंनी आम्ही मोठ्या संघांविरुद्धही आव्हान निर्माण करु शकतो, हे दाखवून दिले. प्रशिक्षक लुईस नॉर्टन डि मातोस यांनी आखलेल्या बचावात्मक रणनीतीचा भारतीय संघाने कोलंबियाविरुध्द चांगल्याप्रकारे अवलंब केला. जर, का नशिबाने साथ दिली असती, तर भारतीय युवांनी या सामन्यात कोलंबियाविरुद्ध धक्कादायक निकालही नोंदवला असता.दरम्यान, घानाविरुद्धही हाच जोश कायम ठेवून कोलंबियाविरुद्ध केलेला खेळ फ्ल्यूक नव्हता हे सिद्ध करण्याचे आव्हान भारतीय युवांपुढे असेल. दुसरीकडे, गटातील सर्वात ताकदवान संघ असलेल्या घानाविरुद्ध आव्हान उभे करणे भारतासाठी सहज शक्य होणार नाही. या सामन्यात तेच संभाव्य विजेते असतील. ‘अ’ गटातून अमेरिकेने सलग दोन विजय मिळवत बाद फेरी गाठली असून, कोलंबिया आणि घाना यांचे प्रत्येकी ३ गुण आहेत. या दोन्ही संघांना बाद फेरी गाठण्यासाठी आपल्या अखेरच्या गटसाखळी सामन्यात विजय अनिवार्य आहे. त्याचवेळी, भारताच्या खात्यात एकही गुण नसून जरी विजय मिळवण्यात भारत यशस्वी ठरला, तरी बाद फेरी त्यांच्यासाठी धूसरच असेल.आतापर्यंतच्या रणनीतीनुसार केलेल्या खेळावर प्रशिक्षक मातोस भारतीय युवांवर समाधानी आहेत. आक्रमकतेवर भारतीयांना आणखी सुधारणा करावी लागेल, त्यांनी म्हटले आहे. गोलरक्षक धीरज सिंग भारताकडून सर्वोत्तम कामगिरी करणा-या खेळाडूंपैकी एक आहे. तसेच, अन्वर अली, नमितदेशपांडे यांनीही बचावफळीत चांगले प्रदर्शन केले आहे. विशेष म्हणजे, अमेरिका आणि कोलंबियाच्या प्रशिक्षकांनी अन्वरच्या खेळाचे कौतुकही केले. त्याचवेळी, भारताला आक्रमकांकडूनही सर्वाधिक आशा असेल. (वृत्तसंस्था)

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017Footballफुटबॉल