शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विश्वकप स्पर्धेतून बरेच काही शिकलो, भारतीय खेळाडूंची प्रतिक्रिया : जगातील अव्वल संघांविरुद्ध खेळलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 02:26 IST

१७ वर्षांखालील विश्वकप फुटबॉल स्पर्धेत सहभागी होताना सर्व भारतीय खेळाडूंमध्ये उत्सुकता होती, पण अनुभवाची उणीव स्पष्ट दिसून आली. भारताने फिफाच्या स्पर्धेत प्रथमच प्रतिनिधित्व केले.

नवी दिल्ली : १७ वर्षांखालील विश्वकप फुटबॉल स्पर्धेत सहभागी होताना सर्व भारतीय खेळाडूंमध्ये उत्सुकता होती, पण अनुभवाची उणीव स्पष्ट दिसून आली. भारताने फिफाच्या स्पर्धेत प्रथमच प्रतिनिधित्व केले.यजमान संघाचे गट साखळीतच आव्हान संपुष्टात आले. भारताने सर्व तिन्ही सामने गमावले असले तरी, त्यांनी कोलंबियाला कडवे आव्हान दिले. पण या सामन्यातही १-२ ने पराभव स्वीकारावा लागला. या व्यतिरिक्त भारताला अमेरिकेविरुद्ध ०-३ ने तर घानाविरुद्ध ०-४ ने पराभवाला सामोरे जावे लागले.कर्णधार अमरजित सिंग म्हणाला, ‘अनुभव चांगला होता. आम्ही जगातील अव्वल संघांविरुद्ध खेळत होतो. घाना संघ तर दोनदा जेतेपद पटकावणारा आहे. आम्हाला त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळाले. संघाच्या बैठकीमध्ये आम्ही १०० टक्केच नाही तर २०० टक्के योगदान देऊ, असा विश्वास व्यक्त केला होता. आम्ही विजयासाठी प्रयत्नशील होतो, कारण आम्हाला चाहत्यांचा पाठिंबा होता, पण आमच्याकडे अनुभवाची शिदोरी नव्हती.’अमरजित पुढे म्हणाला,‘आम्ही १० वर्षांचे झाल्यानंतर फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली, पण अन्य संघाचे खेळाडू वयाच्या सहाव्या वर्षांपासून खेळण्यास सुरुवात करतात. त्याचा मोठा फरक पडतो. आता एआयएफएफ यावर लक्ष केंद्रित करीत आहे. एआयएफएफच्या अनेक योजना असून भारत भविष्यातील स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करेल, असे मला वाटते.’अमरजित म्हणाला, ‘घानाविरुद्धच्या लढतीच्या शेवटी आम्ही थोडे थकलेले होतो. कारण या सामन्याआधी दोन कडव्या लढती खेळलो होतो. काही खेळाडू दुखापतग्रस्त होते तर काहींना स्नायूच्या दुखापतींचा त्रास जाणवत होता.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017