शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
2
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
3
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
4
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
5
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाले?
6
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
7
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
8
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
9
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
10
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
11
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
12
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
13
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
14
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
15
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
16
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
17
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
18
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
19
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
20
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 

१६ ठिकाणचे पाणी नमुने दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 12:29 AM

ग्राम पंचायतस्तरावरील पाणी नमून्याची तपासणी जिल्हास्तरावरील प्रयोगशाळेत केली जाते. जून महिन्यात १२ तालुक्यातील एकूण १ हजार ५४५ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी चार तालुक्यातील १६ पाणी नमुने दूषित आढळून आले. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण ९ हजार ४४७ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देअहेरी तालुका सर्वाधिक दूषित : सहा महिन्यांत ९ हजार ४४७ नमुन्यांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ग्राम पंचायतस्तरावरील पाणी नमून्याची तपासणी जिल्हास्तरावरील प्रयोगशाळेत केली जाते. जून महिन्यात १२ तालुक्यातील एकूण १ हजार ५४५ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी चार तालुक्यातील १६ पाणी नमुने दूषित आढळून आले. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण ९ हजार ४४७ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली.पिण्याच्या पाण्यासंदर्भात पावसाळ्यात प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जाते. दूषित पाण्यापासून कॉलरा, ग्रस्ट्रो, अतिसार, हगवन, टायफाईड आदींसारखे आजार बळावतात. दूषित पाणी पिल्याने नागरिकांचे आरोग्य लवकरच धोक्यात येते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत नेहमी जनजागृती करून नागरिकांनी शुद्ध पाणी प्यावे, असे आवाहन केले जाते. प्रशासनाच्या वतीने दर महिन्यात ग्रामपंचायतस्तरावरील पाणी नमूने घेऊन त्याची तपासणी केली जाते. या तपासणीच्या अहवालानुसार संबंधित ग्रामपंचायतींना हिरवे, लाल, पिवळे अशा तीन प्रकारचे कार्ड दिले जातात. जून २०१८ मध्ये गडचिरोली तालुक्यातील २९९ पाणी नमून्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी दोन नमूने दूषित आढळून आले. धानोरा तालुक्यातील ९० पाणी नमून्यांची तपासणी करण्यात आली. यात एकही नमूना दूषित आढळला नाही. आरमोरी तालुक्यातील ३७५ पाणी नमून्यांपैकी ४ नमुने दूषित आढळून आले. देसाईगंज तालुक्यातील २०३ नमून्यांपैकी २ तर कुरखेडा तालुक्यातील १०४ नमून्यांपैकी ८ नमूने दूषित आढळून आले. उर्वरित कोरची, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, सिरोंचा, एटापल्ली व भामरागड या तालुक्यातील पाणी नमून्यांची तपासणी करण्यात आली. मात्र एकही नमूना दूषित आढळून आला नाही. कोरची तालुक्यात २८, चामोर्शी तालुक्यातील २६३, मुलचेरा ३८, अहेरी ५२ व एटापल्ली तालुक्यातील ८३ तसेच भामरागड तालुक्यातील १० पाणी नमून्यांची तपासणी करण्यात आली. सिरोंचा तालुक्यातून जिल्हास्तरीय प्रयोगशाळेत ग्रामपंचायतीच्या वतीने जून महिन्यात एकही पाणी नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले नाही.गडचिरोली तालुक्यातील २ दूषित पाणी नमून्यातील दूषित पाण्याचे प्रमाण ०.६७ आहे. आरमोरी तालुक्याच्या ४ पाणी नमुन्याच्या तपासणीअंती दूषित पाण्याचे प्रमाण १.०७, देसाईगंजातील २ पाणी नमून्याच्या तपासणीअंती ०.९९, कुरखेडा तालुक्याच्या ८ पाणी नमूने तपासणीअंती दूषित पाण्याचे प्रमाण ७.६९ इतके आढळून आले. तपासणीनंतर पाण्यातील दूषिताचे प्रमाण ७ पेक्षा अधिक असल्यास ते धोक्याचे असते. त्यामुळे संबंधित गावांमध्ये जलजन्य आजार पसरण्याची शक्यता असते.पाच ग्रामपंचायतींना मिळाले लाल कार्डपाणी स्त्रोताच्या ठिकाणचे प्लॅटफॉर्म फुटलेले असणे, सभोवताल घाणीचे साम्राज्य तसेच नियमित पाणी दूषित येत असल्यास संबंधित गावाच्या ग्रामपंचायतींना जि.प.आरोग्य विभागाच्या वतीने लाल कार्ड दिले जाते. एप्रिल महिन्यात करण्यात आलेल्या पाणी स्त्रोताच्या सर्वेक्षणानुसार अहेरी तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींना लाल कार्ड देण्यात आले आहे. यामध्ये रेपनपल्ली, खांदला, राजाराम व नागेपल्ली, खमनचेरू आदी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. सदर ग्रामपंचायतींनी पाणी स्त्रोताच्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवावी, पाणी शुद्ध येण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतwater pollutionजल प्रदूषण