शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा
4
Ratan Tata's Will : वारसदार ठरला! कोणाला मिळणार रतन टाटांची १० हजार कोटींची संपत्ती?
5
आदित्य ठाकरेंच्या वरळीत राज ठाकरेंनी घातलं लक्ष; संदीप देशपांडेंना खास 'मेसेज'
6
मोगँबोच्या नातवाला पाहिलंत का? दिसायला इतका देखणा की स्टारकिडला देतोय टक्कर
7
किंग कोहली फुलटॉस बॉलवर फसला; Mitchell Santner नं उडवला त्रिफळा (VIDEO)
8
भाजपाला रामराम करत संजयकाका पाटील अजित पवार गटात; कवठेमहांकाळमधून उमेदवारी जाहीर
9
निवडणूक विशेष: तिकीट नाही? कर बंड, जा दुसऱ्या पक्षात! विधानसभेसाठी नाराजांचा नवा ट्रेंड
10
लेख: माझ्यावर हल्ला? -आता तुमची शंभरी भरली! आमचे सैनिक जळी-स्थळी दिसतील!
11
जागावाटपाचा संघर्ष मुख्यमंत्रिपदासाठी! निकालानंतर महत्त्वाच्या भूमिकेसाठी मित्रांशी संघर्ष
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
13
JioHotstar डोमेन खरेदी करून पठ्ठ्याने मागितले १ कोटी, आता Reliance नं काय केलं? काय आहे संपूर्ण प्रकरण?
14
“मला पाहताच राज ठाकरेंना अश्रू अनावर झाले होते”; मयुरेश वांजेळेंनी सांगितली भावूक आठवण
15
कधी अन् कुठं पाहता येईल IND-A vs AFG-A Semi-Final 2 ची लढत? जाणून घ्या सविस्तर
16
बारामतीत युगेंद्र पवारांची लढाई स्वतःचं डिपॉझिट वाचवण्यासाठी, तर दादा...; अजित पवार गटानं डिवचलं
17
झिशान सिद्दीकींना राष्ट्रवादीकडून उमेदवारी; नवाब मलिकांना संधी नाही? अजित पवार म्हणाले...
18
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
20
Share Market Opening : आधी किरकोळ तेजी, मग घसरण; मोठ्या घसरणीसह उघडले 'हे' शेअर्स

१९९ कोटी पीक कर्ज वाटपाचे दिले उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 5:00 AM

कर्जासाठी शेतकऱ्यावर सावकाराच्या दारात उभे राहण्याची पाळी येऊ नये, यासाठी शासनाने पीक कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी सदर शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्ज भरणे आवश्यक आहे. बिनव्याजी कर्ज मिळत असल्याने शेतकरी सुध्दा बँकांकडून कर्जाची मागणी करतात.

ठळक मुद्देबँकांना निर्देश : को-आॅपरेटीव्ह बँकेला सर्वाधिक टार्गेट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २०२० च्या खरीप व रबी हंगामात जिल्हाभरातील ३३ हजार १५६ शेतकऱ्यांना १९९ कोटी १८ हजार रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.कर्जासाठी शेतकऱ्यावर सावकाराच्या दारात उभे राहण्याची पाळी येऊ नये, यासाठी शासनाने पीक कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी सदर शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी कर्ज भरणे आवश्यक आहे. बिनव्याजी कर्ज मिळत असल्याने शेतकरी सुध्दा बँकांकडून कर्जाची मागणी करतात. बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास सहजासहजी तयार होत नसल्याने प्रत्येक बँकेला कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून दिले जाते. २०२० च्या खरीप व रबी हंगामासाठी ३३ हजार १५६ शेतकऱ्यांना किमान १९९ कोटी १८ हजार रुपयांचे कर्ज वितरित करावे, असे निर्देश दिले आहेत. प्रत्येक बँकेला कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. ठरवून दिलेल्या उद्दिष्टापर्यंत बँका कधीच कर्ज वाटप करीत नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे यावर्षी किती कर्ज वाटप करतात, याकडे लक्ष लागले आहे.कर्ज वितरण प्रक्रियेला कोरोनाचा फटकाकोरोनामुळे बँकेत शारीरिक अंतर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच केवळ पैसे काढणे व पैसे घेणे यावर मुख्य भर द्यावा, असे निर्देश राष्ट्रीयकृत बँकांच्या मध्यवर्ती कार्यालयांनी बँकांना दिले आहेत. त्यामुळे आजपर्यंत केवळ पैसे काढणे व पैसे भरणे एवढेच व्यवहार केले जात होते. आता खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकरी पीक कर्जासाठी अर्ज करण्याबाबत विचारणा करीत आहेत. मात्र आणखी काही दिवस थांबा, असा सल्ला बँकांकडून दिला जात आहे.मागील वर्षी ९६ कोटींचे कर्ज वितरणमागील वर्षी खरीप हंगामासाठी १५७ कोटी तर रबी हंगामासाठी २३ कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. खरीप हंगामासाठी ९५ कोटी ७६ लाख रुपयांचे कर्ज वितरण झाले. तर रबी हंगामासाठी केवळ २६ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. शेतकऱ्यांकडे आता सिंचनाची सुविधा झाल्याने अनेक शेतकरी उन्हाळ्यातही रबी हंगामाचे पीक घेतात. मात्र रबी हंगामासाठी कर्ज दिले जाते. याची अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही. त्यामुळे ते कर्ज घेत नसल्याचे दिसून येते. काही शेतकरी खरीप पिकाची तोडणी झाल्यावर त्याच शेतात रबी पिकांची लागवड करतात.

टॅग्स :bankबँकCrop Loanपीक कर्ज