शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

१९ दिवसांत जळाले २२२ हेक्टर जंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 4:39 AM

मार्च ते जून या कालावधीत जंगलाला सर्वाधिक आगी लागत असल्याने या कालावधीत वन विभागाचे आगींवर विशेष लक्ष राहते. तसेच ...

मार्च ते जून या कालावधीत जंगलाला सर्वाधिक आगी लागत असल्याने या कालावधीत वन विभागाचे आगींवर विशेष लक्ष राहते. तसेच आगीच्या घटनांची नाेंदही केली जाते. १ ते १९ मार्च या १९ दिवसांच्या कालावधीत सुमारे २२२.७५ हेक्टर जंगलाला आगी लागल्या आहेत. सर्वाधिक जंगल सिराेंचा तालुक्यातील जळाले आहे. ६६ घटनांमध्ये ७०.३० हेक्टर जंगलाला आग लागली आहे.

बाॅक्स .....

सॅटेलाईटमुळे वेळीच नियंत्रण शक्य

जंगलांना लागणाऱ्या आगीची माहिती सॅलेलाईटच्या माध्यमातून सर्वे ऑफ इंडियाकडे पाठविली जाते. यामध्ये अक्षांश व रेखांशाची नाेंद राहते. त्यामुळे नेमक्या काेणत्या भागात आग लागली आहे, याची माहिती वन विभागाला मिळते. प्रत्येक वन कर्मचाऱ्याचे व्हाॅट्स- ॲप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यामध्ये वरिष्ठ अधिकारीसुद्धा आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत आगीचा संदेश संबंधित ग्रुपमध्ये टाकला जाते. त्यामुळे स्थानिक स्तरावर काम करणारे वनरक्षक, वनपाल, वनमजूर वेळीच सजग हाेऊन आग विझवितात. त्यामुळे जंगलाचे हाेणारे माेठे नुकसान थांबण्यास मदत हाेते.

बाॅक्स .....

पावसाअभावी जास्त नुकसान

ऑक्टाेबर महिन्यापासून पावसाने कायमची दडी मारली आहे. पाऊस नसल्याने जंगलातील पालापाचाेळा व शेतातील गवत पूर्णपणे वाळले आहे. त्यामुळे थाेडीही आगीची ठिणगी लागताच आग पसरते. अजूनही बहुतांश तालुक्यांमध्ये पाऊस झाला नाही. त्यामुळे यावर्षी जंगलांना आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ हाेणार आहे. परिणामी वन विभागाला विशेष सजग रहावे लागणार आहे. ज्यावर्षी जानेवारी, फेब्रुवारीमध्ये पाऊस पडतो त्यावर्षी जंगल कमी प्रमाणात जळत असल्याचा अनुभव आहे.

बाॅक्स....

वन विभागामार्फत जागृती

माेहफूल वेचण्यासाठी किंवा धुरे जाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आग लावू नये, जंगलाला लागलेल्या आगीमुळे जैवविविधतेचे कसे नुकसान हाेते, याबाबत वन विभागामार्फत जागृती केली जात आहे. तसेच काही ठिकाणी माेहाच्या झाडाखालचा पालापाचाेळा वन विभागाचे कर्मचारी स्वत: ब्लाेअर मशीनने काढून देत आहेत.

बाॅक्स ...

१ ते १९ मार्चपर्यंत जळालेले जंगल

वनविभाग घटना जळालेले क्षेत्र (हेक्टर)

गडचिराेली ९८ ५२.९२

आलापल्ली ३८ ६.८

देसाईगंज ९२ ४२.७३९

सिराेंचा ६६ ७०.३०

भामरागड २८ ४९.९७

एकूण ३२२ २२२.७५