शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

२६ हजारांवर शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज; कृषिपंपधारकांना या योजनेचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 4:33 PM

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना : ७.५ एचपी क्षमतेपर्यंत मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : कृषिपंपधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने 'मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना' राज्यात अमलात आणलेली आहे. जिल्ह्यातील ७.५ एचपी (अश्वशक्ती) क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाणार आहे. जिल्ह्यातील २६ हजार ५०० वर कृषिपंपधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांची थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देशाने 'मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना' राबविली जात आहे. यामुळे कृषिपंप ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळ, पूर यासह विविध संकटांचा सामना करावा लागतो. हे संकट झेलताना शेतकऱ्यांना कृषिपंपाचे बिल भरण्यासाठी अडचणी येतात. परिणामी बिल थकीत राहते. शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन शासनातर्फे ७.५ अश्वशक्तीपर्यंत वीज मोफत दिली जाणार आहे.

हे शेतकरी आहेत पात्र...७.५ एच.पी.पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक मोफत वीज योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.चक्राकार पद्धतीने कृषिपंपांना विद्युत पुरवठा केला जाणार आहे.

असा आहे योजनेचा कालावधीमुख्यमंत्री बळीराजा वीज योजना ५ वर्षांसाठी राबविली जात आहे. एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ पर्यंत या योजनेचा कालावधी आहे. मात्र, योजना सुरू होऊन ३ वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत शासनाकडून निर्णय घेण्यात येणार आहे.

२४,५२१ शेतकऱ्यांना देयक माफीमुळे दिलासाराज्य शासनाने कृषिपंपधारकांचे वीजबिल माफ करण्याची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. यानुसार जिल्ह्यातील २४ हजार ५२१ शेतकऱ्यांचे १२० कोटी रुपयांचे वीजबिल माफ होणार आहे 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाGadchiroliगडचिरोली