शहरं
Join us  
Trending Stories
1
भावना गवळी, कृपाल तुमानेंना विधानपरिषदेची उमेदवारी; शिंदे गटात नाराजी
2
हाथरस येथील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा वाढला, रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठीही उरली नाही जागा   
3
"हिंदूंना विचार करावा लागेल, हा अपमान योगायोग की प्रयोग'; लोकसभेत काय म्हणाले PM मोदी?
4
"आजकल बच्चे का मन बहलाने का काम चल रहा है...", निवडणूक निकालावरून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
"सलग तिसऱ्यांदा १०० च्या आत, तिसरा पराभव, तरीही काँग्रेस आणि त्यांची इकोसिस्टिम...", मोदींचा खोचक टोला
6
“जयंत पाटील तुम्ही नकली वाघांसोबत आहात, जरा असली वाघांसोबत या”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
"मतदारांनी काँग्रेसलाही जनादेश दिला, तो विरोधी बाकावर बसण्याचा", PM मोदींची बोचरी टीका...
8
“तिसऱ्या टर्ममध्ये तिप्पट वेगाने काम, विकसित भारताचा संकल्प पूर्ण होणार”; PM मोदींची लोकसभेत गॅरंटी
9
"2014 पूर्वी देशात घोटाळ्याचा काळ होता...", लोकसभेतून PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
किंग खानच्या शिरपेचात मानाचा तुरा! 'या' इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुखचा होणार खास सन्मान
11
"अब की बार चोको बार", DMK खासदारानं भाजपच्या घोषणेची उडवली खिल्ली!
12
विश्वास वाढवणारा विश्वविजय! देशाने पाहिलेलं गोड स्वप्न साकार होतं तेव्हा...
13
काँग्रेसमधून निवडून आलेलो याचा मला गर्व, शंका नसावी; अशोक चव्हाणांचे राज्यसभेत वक्तव्य 
14
“मी एकनाथ शिंदेंची लाडकी बहीण”; विधान परिषद उमेदवारीवर भावना गवळींची प्रतिक्रिया
15
"राहुल गांधींना 'अभय मुद्रे'संदर्भात ज्ञान नाही; मी त्यांना..."! रामभद्राचार्य स्पष्टच बोलले
16
“राहुल गांधींकडून हिंदू धर्माचा अपमान झाला नाही”; उद्धव ठाकरेंनी केले स्पष्ट, भाजपावर टीका
17
इस्लाममध्येही असते ‘अभय मुद्रा’? राहुल गांधींचा दावा अजमेरच्या चिश्तींनी फेटाळला, म्हणाले, तसा कुठलाही...
18
लफडे... अन् ब्लॅकमेल! तीन वर्षांपासून ज्या तरुणीने १० लाख वसूल केले, ती पत्नीच निघाली
19
“हीच वेळ आहे, आम्ही गेल्यावर तुम्ही एकत्र येणार का”; मनोज जरांगेंचा मराठा नेत्यांना सवाल
20
Airtel आणि Jioच्या ग्राहकांकडे आज अखेरची संधी, स्वस्तात करा रिचार्ज; उद्यापासून प्लान्स महागणार

वाघिणीला लागला बछड्यांचा लळा; पालनपोषणासाठी पकडते माणसांचा गळा, लोकांमध्ये आक्रोश

By गेापाल लाजुरकर | Published: December 27, 2022 8:50 PM

जेरबंद केव्हा करणार?; गडचिरोली तालुक्यातील लोकांमध्ये आक्रोश

गडचिरोली : तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून नरभक्षक वाघांचा धुमाकूळ आहे. १२ ते १५ किमीच्या जंगल परिसरात वावरून शेतकरी व अन्य लोकांचा बळी वाघ घेत आहेत. ह्या वाघांनी एवढी दहशत वाढविली की लोकांनी जंगलात जाणेच बंद केले. तेव्हा हल्ले थांबले; परंतु जंगलात न जाताही आता शेतात जाणाऱ्या लोकांवर वाघ हल्ले करून त्यांचा बळी घेत आहेत. आता तर चार पिल्ले सांभाळणाऱ्या वाघिणीची भूक एवढी वाढली की  पिलांचे पालनपोषण करण्यासाठी वाघीण लोकांनाच लक्ष्य करून त्यांचे गळे पकडत आहे. त्यामुळे वाघिणीला केव्हा जेरबंद करणार, असा प्रश्नरुपी आक्रोश तालुक्यातील लोकांमध्ये आहे.

२०१९ पासून गडचिरोली जिल्ह्यात वाघांची दहशत वाढली असली तरी, गेल्या तीन महिन्यापासून नरभक्षक वाघिणीने तालुक्यातील जेप्रा, दिभना, राजघाटा चेक आंबेशिवणी, आंबेटोला, भिकारमौशी, अमिर्झा, कळमटोला चुरचुरा जंगल परिसरात धुमाकूळ घालून लोकांचा बळी घेतला. गेल्या तीन महिन्यांपासून ही वाघीण चार पिलांना जंगलात गुप्त ठिकाणी लपवून ठेवून ती याच भागातील शेतशिवारात आपले भक्ष्य शोधते. नरभक्षक वाघिणीसह अन्य वाघांवर देखरेख ठेवण्यासाठी व लोकांना सतर्क करण्यासाठी वन विभागाने दिभना परिसरात सहा पथके वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केली. ही पथके सकाळपासून सायंकाळपर्यंत जंगलात ठाण मांडून असतात. तरीसुद्धा नागरिक जंगलात अथवा जंगलालगतच्या शेतशिवारात जाण्याचा मोह आवरत नाहीत.

परिणामी मनुष्यावरील हल्ले वाढत आहेत. शेवटी शेतकरी सुद्धा करणार तरी काय शेती असल्याने त्यांना प्रत्यक्ष शेतात पिकाची पाहणी अथवा वेगवेगळ्या कामासाठी जावेच लागते. यापूर्वी तर वाघ वाघीण जंगलात येणाऱ्या लोकांवरच हल्ले करीत होते. आता तर शेतशिवारात काम करणाऱ्या लोकांवर वाघ हल्ले करून त्यांना यमसदनी पाठवत आहेत. याला जबाबदार कोण वनविभाग की स्वतः शेतकरी हे सुद्धा सांगणे कठीण आहे. कारण जागृती करणे वन विभागाचे काम आहे तर जंगल व शेतीवर शेतकऱ्यांचे जीवन अवलंबून असल्याने त्यांनाही तेथे जाण्यापासून रोखता येत नाही.

टी-६ वाघिणीने घेतले १० बळी

गडचिरोली तालुक्याच्या दिभना, जेप्रा, राजगाटा, कळमटोला, धुंडेशिवणी व चुरचुरा जंगल परिसरात गेल्या सात महिन्यांपासून दहशत माजविणाऱ्या टी-६ वाघिणीने आतापर्यंत ९ लोकांचा बळी घेतला होता. आंबेटोला येथील घटनेनंतर बळींची संख्या आता १० झाली. बळी गेलेल्यांमध्ये पाच महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये कळमटोला येथील २, तर धुंडेशिवणी, चुरचुरा, अमिर्झा, राजगाटा चक, दिभना, आंबेशिवणी, राजगाटा माल व आंबेटोला येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.

पोटभर शिकारीसाठी वाघीण झाली आक्रमक

एका वाघासाठी किमान ४५ ते ६० चौ.कि.मी. जंगलक्षेत्र आवश्यक असते, तर मादी वाघ कोणत्याही वाघाच्या क्षेत्रात जाऊ शकते. पिलांसह वावरणारी वाघीण ८ ते १० किमी परिसरात वावरते व भक्ष्य शोधते. दिभना जंगलक्षेत्रात असलेल्या वाघिणीला तेवढे क्षेत्र मिळत नसल्याने. अल्प क्षेत्रातच ती वावरते. याच क्षेत्रात ती भक्ष्य शोधते. चार पिल्ले असल्याने पोटभर शिकार मिळावी यासाठी ती मिळेल त्या प्राण्यांची शिकार करते. ती माणसावरही तुटून पडते.

वाघिणीची दोन वाघांशी संगत

हल्लेखोर टी-६ वाघिणीला जी-१ व जी-१० ह्या दोन वाघांची संगत आहे. जी-१ हा वाघ गडचिरोली तालुक्यासह चामोर्शी व धानोरा तालुक्यातील काही भागात वावरतो तर जी-१० हा वाघ गडचिरोली तालुक्यासह आरमोरी तालुक्यातील जंगलात वावरतो.त्याला वडसा वन विभागात टी-५ नावाने ओळखले जाते. दोन वाघ, एक वाघीण व चार पिल्ले असा वाघांचा गोतावळा गडचिरोली तालुक्यातील जंगलात वावरून धुमाकूळ घालत आहे.

वाघिणीला पिलांसह पकडण्याची परवानगी मिळाली आहे; परंतु वाघ पकडणारे ताडोबा व अमरावतीचे पथक उपलब्ध नाही. ती पथके दुसऱ्या ठिकाणी वाघ पकडण्यात व्यस्त आहेत. पिलांसह जेरबंद करणे कठीण असले तरी, पथके उपलब्ध झाल्यानंतर तातडीने वाघिणीला पिलांसह जेरबंद केले जाईल.- डॉ. किशोर मानकर, वनसंरक्षक गडचिरोली

टॅग्स :TigerवाघGadchiroliगडचिरोली