शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

तेंदूपत्ता संकलनाची लगबग वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 23:27 IST

ग्रामीण व दुर्गम भागात तेंदूपत्ता संकलनाच्या कामाला सुरूवात झाली आहे. सकाळपासून दुपारी उशीरापर्यंत तेंदूपत्त्याचे संकलन करून जास्तीत जास्त मजुरी पाडण्यासाठी तेंदूपत्ता मजुरांची लगबग वाढली आहे.

ठळक मुद्देतेंदूपत्ता मजूर रवाना : ग्रामीण भागातही संकलन सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ग्रामीण व दुर्गम भागात तेंदूपत्ता संकलनाच्या कामाला सुरूवात झाली आहे. सकाळपासून दुपारी उशीरापर्यंत तेंदूपत्त्याचे संकलन करून जास्तीत जास्त मजुरी पाडण्यासाठी तेंदूपत्ता मजुरांची लगबग वाढली आहे.गडचिरोली जिल्ह्यात तेंदूपत्त्याची मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. तसेच तेंदूपत्त्याचा दर्जाही चांगला आहे. त्यामुळे येथील तेंदूपत्त्याला राष्ट्रीय बाजारात चांगली मागणी आहे. जवळपास एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तेंदूपत्ता परिपक्व होत असल्याने तेंदूपत्ता संकलनाच्या कामाला सुरूवात झाली आहे. पेसा कायद्यांतर्गत तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार ग्रामसभांना दिले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास ९०० ग्रामसभा स्वत:हून तेंदूपत्ता संकलनाचे काम करीत आहेत.उन्हाळ्यात ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध राहत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील मजूर तेंदूपत्ता संकलनासाठी दुर्गम भागात जातात. यापूर्वी तेंदूपत्ता संकलनाचे काम वन विभाग करीत होते. पेसा कायद्यानंतर मात्र ग्रामसभांना तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार देण्यात आल्याने काही ग्रामसभा स्वत:हून तेंदूपत्ता संकलन करीत आहेत. तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम जवळपास १५ दिवस चालतो. यातून प्रत्येक व्यक्ती पाच ते सहा हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त करते.लोकसभेच्या आचारसंहितेमुळे ग्रामसभांचे कंत्राटदारांसोबत करारनामे करताना अडचणी आल्या होत्या. मात्र आचारसंहिता शिथील होण्याची प्रतीक्षा केल्यास तो पर्यंत तेंदूपत्त्याचा हंगाम हातून निघून गेला असता. त्यामुळे ग्रामसभांनी यातून मार्ग काढत कंत्राटदारासोबत करारनामे केले. त्यामुळे आता तेंदूपत्ता संकलनाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील चार दिवसात तेंदूपत्ता संकलनाला पुन्हा गती येणार आहे.तेंदूपत्त्याचा दर्जा चांगलायावर्षी कडक ऊन पडल्याने तेंदूपत्त्याचा दर्जा अतिशय चांगला आहे. त्यामुळे तेंदूपत्त्याचे अधिकाधिक संकलन करणे मजुरांना शक्य होत आहे. तेंदूपत्त्याचा दर्जा चांगला असल्यास कंत्राटदारालाही व्यापाऱ्याकडून चांगला भाव मिळणार आहे. त्यामुळे मजूर व कंत्राटदार सध्या समाधानी आहेत. बाहेरगावावरून तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या नागरिकांना जंगलातच झोपड्या उभारून राहावे लागते. मात्र मागील काही दिवसांपासून अधूनमधून वादळ वाºयासह पाऊस सुरू आहे. यामुळे नागरिकांचे हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :forest departmentवनविभाग