शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
2
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
3
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
4
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
5
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
6
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
7
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप
8
कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास
9
सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेल्या अपक्ष आमदाराला महायुती, मविआत प्रवेश बंदी, काय घडलं?
10
IND vs NZ : कॅप्टन Tom Latham ची बॅट तळपली; न्यूझीलंडनं घेतलीये ३०१ धावांची आघाडी
11
दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले...
12
काय सांगता? महिन्याला १ लाख रुपये कमवतात भिकारी; स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही करतात वापर
13
Maharashtra Assembly 2024: मेघना बोर्डीकर विरुद्ध विजय भांबळे; जिंतूरमध्ये राजकीय गणित कसं?
14
पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु...
15
Sonu Sood : "आपला देश सुरक्षित"; बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर सोनू सूद रोखठोक बोलला!
16
कोकणात मविआमध्ये बंडखोरी, सावंतवाडीत अर्चना घारे-परब यांनी भरला उमेदवारी अर्ज
17
नाशिक शहरात एकही जागा काँग्रेसला नाही; इच्छुक ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात अपक्ष लढणार
18
रोहितच्या नावे लाजिरवाणा विक्रम; धोनी-विराटच्या कॅप्टन्सीत असं कधीच नाही घडलं
19
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
20
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे

विविध मागण्यांसाठी संतप्त नागरिक तीन तास रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:23 AM

दक्षिण अहेरी उपविभागामधील कमलापूर हे भाग राष्ट्रीय महामार्गावर येतो, परंतु कमलापूर क्षेत्रातील जवळपास ६० गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. ...

दक्षिण अहेरी उपविभागामधील कमलापूर हे भाग राष्ट्रीय महामार्गावर येतो, परंतु कमलापूर क्षेत्रातील जवळपास ६० गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. दुर्गम भागात जाण्यासाठी पक्के रस्ते नाही, अनेक भागात विद्युत सेवा पोहोचली नाही. अपेक्षित विकास कोणत्याही या भागात झालेला नाही. लोकप्रतिनिधी व शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी भ्रष्टाचार निवारण समिती व गावकऱ्यांकडून सिरोंचा मार्गावर कमलापूर फाट्याजवळ चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यात ३ तास वाहतूक पूर्णपणे या राष्ट्रीय महामार्गावर बंद होती.

या आंदोलनात ग्रामसभा पॅनल अध्यक्ष रजनीता मडावी, जनकल्याण समाजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे संतोष ताटीकोंडावार, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन जिल्हा अध्यक्ष विजय खरवडे, राजेंद्र चौधरी, अमोल भट, कैलास कोडापे, प्रकाश दुर्गे तसेच २० गावांतील प्रतिष्ठित नागरिक व माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

बाॅक्स :

या आहेत प्रमुख मागण्या

अतिक्रमणधारकांची तीन पिढीच्या पुराव्याची अट रद्द करावी, छल्लेवाडा येथे स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करावी, वनमजुरांची थकीत रक्कम त्वरित देण्यात यावी, कमलापूर येथे मंजूर असलेले मंडळ कार्यालय बांधकाम करावे, कमलापूर येथे मंजूर असलेले ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र निर्माण करावे, दामरंचा बससेवा व ३जी नेटवर्क सुरू करावे, लक्कामेंडा पहाड पर्यटनस्थळ म्हणून घोषित करून विकासातून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, कमलापूर येथे महाविद्यालय निर्माण करावे, वनउपज गोळा करण्यासाठी व्यवस्था व खरेदी व विक्री केंद्र सुरू करावे, आलापल्ली-सिरोंचा मार्गाची चौकशी करून दोषी कंत्राटदार व अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावेत, अहेरी-सिरोंचा व्हाया कमलापूर छल्लेवाडा राजाराम मार्गे बससेवा सुरू करावी, कमलापूर येथे नवीन तलावाचे शिल्लक खोलीकरण व कॅनल बांधकाम करण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.

बाॅक्स :

तीन तासांनंतर चारचाकी वाहनधारकांना दिलासा

सदर रास्ता रोको आंदोलनस्थळी नायब तहसीलदार फारुक शेख, मंडळ अधिकारी आर. पी. सिडाम, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना त्यांच्या समस्या वरिष्ठांपर्यंत पाेहोचविण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलन थांबवून दळणवळणासाठी मार्ग मोकळा करण्यात आला.

040721\img_20210704_070100.jpg

*विविध मागण्यांसाठी 3 तास नागरीक रस्त्यावर.*