शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आष्टी-चंद्रपूर मार्ग खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:57 IST

पावसाळ्यामध्ये बरेच मार्ग खड्डेमय झालेले आहेत. आता पावसाळा संपून एक महिन्याचा कालावधी उलटला तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आलेली नाही. आष्टी-चामोर्शी या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत.

ठळक मुद्देअपघाताची शक्यता बळावली : वर्षभरात अनेक ठिकाणी खड्डे

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : पावसाळ्यामध्ये बरेच मार्ग खड्डेमय झालेले आहेत. आता पावसाळा संपून एक महिन्याचा कालावधी उलटला तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आलेली नाही. आष्टी-चामोर्शी या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. परिणामी प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्याची अतिशय बकाल अवस्था झाल्याने या मार्गावर अपघाताची शक्यता बळावली आहे.आष्टी येथील आंबेडकर चौकामध्ये चामोर्शी मार्गावर गेल्या चार महिन्यांपासून मोठे खड्डे पडलेले आहेत. मात्र अद्यापही हे खड्डे बुजविण्यात आले नाही. याच मार्गावर हॉटेल, चहाटपरी असल्याने वाहनधारकांची मोठी गर्दी असते. शिवाय याच मार्गावर बसथांबा असल्याने प्रवाशांचीही मोठी वर्दळ असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी दिवसभर मोठे ट्रेलर, बसेस आवागमन करीत असतात. परिणामी मोठे वाहन आल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. संबंधित विभागाने रस्त्यालगतच्या दुकानदारास नोटीस बजावावी, रस्त्यावरील गिट्टी उचलण्यास सांगावी, अशी मागणी होत आहे. सदर मार्गावर शुभम हॉटेलजवळ रस्ता एका बाजूने दबलेला आहे. त्यामुळे वाहने सांभाळूनच चालवावी लागत आहे. वैनगंगा नदीवर पूर्ण रोडवर अर्धा ते एक किमी फूट अंतराचे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. ते अद्यापही बुजविण्यात आले नाही. त्यामुळे संबंधित अपघाताचा मुहूर्त तर शोधत नाही ना? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रस्ता दुरूस्तीची मागणी होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा