शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

जंगली हत्तींमुळे झालेल्या नुकसानीची मिळणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2022 5:00 AM

प्रचलित शासन निर्णयामध्ये वन्यहत्तींमुळे इमारती/ घरांचे नुकसान झाल्यास नुकसानभरपाई देण्याच्या तरतुदींचा समावेश नव्हता. १७ जून राेजी काढलेल्या शासन निर्णयात मदत देण्याची तरतूद  करण्यात आली आहे.  हत्तींनी केलेल्या नुकसानीची तक्रार घटनेच्या तीन दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे. वन्यहत्तींकडून ज्या मालमत्तेचे नुकसान झाले असेल अशी मालमत्ता, साहित्य जागेवरील वस्तुस्थितीचा पंचनामा होईपर्यंत घटनास्थळावरून हलविलेली नसावी.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र राज्यात वन्यहत्तींचा अधिवास आढळून येत नाही. तथापि, इतर राज्यांतून येणाऱ्या वन्यहत्तींमुळे होणारे शेतपिकाचे नुकसान, तसेच इतर मालमत्तेच्या होणाऱ्या नुकसानीपोटी अर्थसाहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तथापि, प्रचलित शासन निर्णयामध्ये वन्यहत्तींमुळे इमारती/ घरांचे नुकसान झाल्यास नुकसानभरपाई देण्याच्या तरतुदींचा समावेश नव्हता. १७ जून राेजी काढलेल्या शासन निर्णयात मदत देण्याची तरतूद  करण्यात  आली  आहे. हत्तींनी केलेल्या नुकसानीची तक्रार घटनेच्या तीन दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे. वन्यहत्तींकडून ज्या मालमत्तेचे नुकसान झाले असेल अशी मालमत्ता, साहित्य जागेवरील वस्तुस्थितीचा पंचनामा होईपर्यंत घटनास्थळावरून हलविलेली नसावी. प्रत्येकप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळावर जाऊन संबंधित  वनपरिक्षेत्र अधिकारी, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, तलाठी/ ग्रामसेवक या तीन सदस्यांच्या समितीमार्फत १४ दिवसांच्या आत पंचनामा करण्यात येईल व नुकसानीचे मूल्यमापन ठरवून अहवाल संबंधित सहायक वनसंरक्षक / विभागीय वन अधिकारी / उपवनसंरक्षक यांना सादर करतील. संबंधित सहायक वनसंरक्षक / विभागीय वन अधिकारी / उपवनसंरक्षकांनी आदेश काढल्यानंतर ३ कामाच्या दिवसांच्या आत किंवा घटनेची तक्रार प्राप्त झाल्यापासून २६ दिवसांच्या आत आर्थिक साहाय्याची रक्कम बाधित व्यक्तीच्या खात्यात जमा केला जाईल किंवा रेखांकित धनादेश हस्तांतरित केला जाईल, असे निर्णयात म्हटले आहे.

यांना नाही मिळणार लाभ    वनजमिनीवर अतिक्रमणाद्वारे शेती करण्यात येत असेल, तर संबंधितास अर्थसाहाय्य अनुज्ञेय राहणार नाही.     भारतीय वन अधिनियम, १९२७ किंवा वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये ज्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला गेला आहे, अशा व्यक्तीस सदरचा लाभ देय राहणार नाही.     ज्या कुटुंबाची चारपेक्षा अधिक गुरे मुक्त चराईसाठी जंगलात जातात त्यांना अर्थसाहाय्य अनुज्ञेय राहणार नाही.

...अशी मिळणार मदत 

शेती अवजारे व उपकरणे, बैलगाडीचे नुकसान झाल्यास नुकसानीची रक्कम मात्र जास्तीत जास्त पाच हजार रुपये, संरक्षक भिंत किंवा कुंपणाचे नुकसान झाल्यास जास्तीत जास्त १० हजार रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल. काैलारू घराचे नुकसान झाल्यास ५० हजार व स्लॅबच्या घराचे नुकसान झाल्यास एक लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग