शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

देसाईगंजमधील शासकीय जागा हडपण्याचा प्रयत्न?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 22:11 IST

देसाईगंजच्या गुलमोहर कॉलनीतील गांधी वॉर्डमध्ये असलेल्या शासनाच्या खुल्या जागेवर काही बेघर गरीब कुटुंबांनी बांधलेल्या झोपड्या नगर परिषदेच्या वाहनांची मदत घेत पोलिसांनी रात्री ११ वाजता उठविल्या. यावेळी त्या कुटुंबांना शिवीगाळ आणि मारहाणही झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ठळक मुद्देझोपडीधारकांना मारहाण : रात्री ११ वाजता केले बेघर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देसाईगंजच्या गुलमोहर कॉलनीतील गांधी वॉर्डमध्ये असलेल्या शासनाच्या खुल्या जागेवर काही बेघर गरीब कुटुंबांनी बांधलेल्या झोपड्या नगर परिषदेच्या वाहनांची मदत घेत पोलिसांनी रात्री ११ वाजता उठविल्या. यावेळी त्या कुटुंबांना शिवीगाळ आणि मारहाणही झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दुसऱ्या कोणाला ती शासकीय जागा हडपण्यास मदत करण्यासाठी आम्हाला तेथून हटविण्यात आले असून आम्हाला हक्काचा निवारा देऊन न्याय द्यावा, अशी मागणी बेघर कुटुंबियांनी उपविभागीय अधिकाºयांमार्फत जिल्हाधिकाºयांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.सदर निवेदनात नमुद केल्यानुसार, देसाईगंजच्या गुलमोहर कॉलनी परिसरात महसूल व वनविभागाची काही जागा अनेक वर्षांपासून रिकामी पडून आहे. ती जागा हडपण्याच्या उद्देशाने कोणीतरी त्या जागेत बांधकाम साहित्य आणले होते. दरम्यान आतापर्यंत कुठेतरी आडोशाने राहणाºया गोरगरीब २५ कुटुंबांनी या शासकीय जागेत (सर्व्हे नं.४३२) काही दिवसांपूर्वी आश्रय घेतला. मात्र दि.२२ आॅक्टोबरच्या रात्री ११ च्या सुमारास अचानक पोलिसांचा ताफा आला आणि त्यांनी काहीही सूचना न करता त्यांच्या काठ्यांनी मारणे सुरू केले. आमचा गुन्हा काय, अशी विचारणा केली असता ते काहीही ऐकायला तयार नव्हते. विशेष म्हणजे पोलिसांच्या ताफ्यासोबत नगर परिषदेचा कर्मचारी व ट्रॅक्टरसुद्धा झोपडीवाल्यांचे साहित्य नेण्यासाठी होता. त्यामुळे त्या जागेसंदर्भात नगर परिषदेचा संबंध काय? ती जागा नगर परिषदेच्या मालकीची नाही किंवा शासनाने कोणत्या कारणासाठी ती जागा कोणाला दिलेली नाही. मग असे असताना आम्हाला हटविण्यात नगर परिषदेने पुढाकार घेण्याची गरज काय? असा सवाल तक्रारकर्त्यांनी केला आहे.झोपडीधारकांवरील कारवाई नियमबाह्यवास्तविक कोणत्याही शासकीय जागेतील अतिक्रमण हटविताना संबंधितांना आधी नोटीस द्यावी लागते. त्यानंतरही ते स्वत:हून हटले नाही जबरीने अतिक्रमण काढता येते. पण सायंकाळी ६ वाजताच्या नंतर राहत्या घराचे अतिक्रमण हटविता येत नाही. असे असताना या प्रकरणात रात्री ११ वाजता कारवाई करून गोरगरीब कुटुंबांना बेघर कसे केले? असा प्रश्न तक्रारकर्त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी विमल बोरडे, पुष्पा रामटेके, राणी बन्सोड, शालू मेश्राम, विणा मेश्राम, तारा मडावी, विमल कनोजिया, कल्पना भोयर, सुशिला गजभिये, अन्वरी अंसारी, कनिजा शेख आदी अनेक महिला व पुरूषांनी केली आहे.