शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
3
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
4
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
5
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
6
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
8
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
9
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
10
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
11
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
12
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
13
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
14
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
15
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
16
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
17
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
18
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
19
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
20
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण

विदर्भातील नोकऱ्यांचा बॅकलॉग दोन लाखांवर

By admin | Published: September 23, 2016 1:39 AM

नागपूर करारानुसार २३ टक्के नोकऱ्यात विदर्भाचा वाटा असताना २.५ टक्क्यांच्यावर विदर्भातील युवकांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत.

स्वतंत्र राज्य द्या : विदर्भ राज्य आंदोलन समितीची माहितीकोरेगाव/चोप : नागपूर करारानुसार २३ टक्के नोकऱ्यात विदर्भाचा वाटा असताना २.५ टक्क्यांच्यावर विदर्भातील युवकांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे विदर्भातील नोकऱ्यांचा बॅकलॉग दोन लाखांवर गेला आहे. हा बॅकलॉग दूर होण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण होणे काळाची गरज असल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे युवक आघाडी जिल्हा समन्वयक गौरव नागपूरकर यांनी म्हटले आहे.महाराष्ट्र राज्याची बेताची आर्थिक परिस्थिती आणि त्यातच सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीमुळे राज्याच्या तिजोरीवर पडलेला बोजा याचा फटका मंत्रालयासह राज्यातील सरकारी सेवेला बसत आहे. मंत्रालयातील कक्ष अधिकारी ते शिपाई अशी १ हजार २०७ पदे गेल्या वर्षापासून रिक्त आहे. राज्यभरात तब्बल ९० हजार पद रिक्त आहे. विशेष म्हणजे तिजोरीतील खळखळाटामुळे ही पदे न भरण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. एकूण महसुलापैकी ७० टक्के महसूल राज्याच्या आस्थापनेवर खर्च होत आहे. वाढीव पद भरण्याच्या मुद्यावर वर्षापूर्वी सरकारने आढावा घेतला होता. राज्याच्या अर्थमंत्री पदाची धूरा जयंत पाटील यांच्याकडे असताना त्यांनी आर्थिक परिस्थितीबाबत श्वेतपत्रिका काढली होती. त्यानंतर सरकारी महामंडळ तसेच सरकारी आस्थापनेवर होणारा वाढीव खर्च यावर समिती नेमण्यात आली होती. या समितीने आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेली महामंडळे बंद करावीत आणि अनावश्यक वाढीव पद रद्द करावीत, अशी शिफारशी केल्या. त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांची वाढीव पदे भरण्यात आली नाही. त्यामुळे तरूणांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येथील युवकांना नोकरी मिळण्यासाठी स्वतंत्र विदर्भ होणे अत्यंत आवााश्यक आहे असे नागपूरकर यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)