शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
2
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
3
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
4
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
5
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
6
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
7
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
8
रोहित पवारांनी CM शिंदेंना दाखवला जुना व्हिडीओ; "माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण..."
9
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
10
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
11
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही
12
“शिंदेंनी सूरत, गुवाहाटी किंवा कामाख्या मंदिरासमोर दसरा मेळावा घ्यावा”; संजय राऊतांचा टोला
13
बांगलादेशचा डाव २३३ धावांत आटोपला; टीम इंडियाकडे 'वनडे स्टाईल'मध्ये कसोटी जिंकण्याची संधी
14
Share Market Live Update : शेअर बाजारात हाहाकार, Sensex १००० अंकांपेक्षा अधिक आपटला; २७९ कंपन्यांच्या शेअर्सना लोअर सर्किट
15
500 च्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो, खुद्द अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ
16
तुम्ही लढत बसाल, वकील खुश होतील; घटस्फोटाच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश काय बोलले?
17
"आपण आपल्या प्रकृतीच्या बाबतीत PM मोदींना विनाकारण ओढलं, प्रार्थना करतो की...'; शाह यांचा खर्गेंवर पलटवार
18
नसरल्लाहच्या मृत्यूचे पडसाद भारतात उमटले; लखनौला शेकडो लोक रस्त्यावर उतरले
19
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
20
अखेर Ashneer Grover यांनी BharatPe सोबतचा वाद सोडवला, काय झाली दोघांमध्ये डील?

केंद्रापेक्षा बांधावरचे खत महाग

By admin | Published: August 05, 2014 11:26 PM

महाराष्ट्र शासनाने मोठा गाजावाजा करीत बांधावर खत योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविली. त्यानंतर सदर योजना शासनाने बंद केली. सध्य:स्थितीत बांधावर खत योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविली जात आहे.

अरूण राजगिरे ल्ल कोरेगाव/चोपमहाराष्ट्र शासनाने मोठा गाजावाजा करीत बांधावर खत योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविली. त्यानंतर सदर योजना शासनाने बंद केली. सध्य:स्थितीत बांधावर खत योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविली जात आहे. परंतु सदर योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बांधावर खताचा पुरवठा करतांना कृषी केंद्रावर मिळणाऱ्या खताच्या किंमतीपेक्षा जास्त रक्कम वसूल केली जात आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे बांधावर खत योजना ही शेतकऱ्यांच्या फायद्याची की, नुकसानीची असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत. खत निर्मात्यांकडून ज्या खताच्या बॅगवर एमआरपी छापली आहे. त्यापेक्षा कमी दराने कृषी केंद्रात खत मिळत असून दी विदर्भ को-आपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन नागपूर यांनी पाठविलेल्या खताच्या किंमतीत प्रत्येक खताच्या बॅगवर ४० ते ५० रूपयांचा फरक आहे. त्यामुळे शासनाच्या ‘बांधावर खत’ योजनेत काळाबाजार नाही का, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत बांधावर खत योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत बांधावर बियाणे व खत पुरविण्यासाठी वाहतूक खर्चाचेसुद्धा नियोजन होते. यासाठी जि. प. गडचिरोली यांच्याकडे ३ लाख ५ हजार रूपयाची तरतूद करण्यात आली होती. परंतु रॅक पार्इंट असलेल्या देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. दी विदर्भ को-आपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन यांनी ग्रेड व कंपनीनिहाय खताच्या किंमतीचे दर पत्रकानुसार जे या योजनेंतर्गत बांधावर खत योजना आहे. त्यामध्ये प्रत्येक कंपनीच्या प्रती बॅगवर ४० ते ५० रूपये जादा दर आकारण्यात आले. केवळ युरिया वगळता इतर खत जादा किंमतीने विक्री केले जात आहे. त्यामुळे बांधावरील खत योजनेद्वारे मिळणारे खत कृषी केंद्रावरील खतापेक्षा महाग असल्याचे दिसून येत आहे.