शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
2
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

अहेरी जिल्ह्याच्या मागणीसाठी बंद

By admin | Published: August 03, 2014 12:06 AM

अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्यावतीने अहेरी जिल्हा घोषित करण्यात यावा, या मागणीसाठी १ आॅगस्ट रोजी बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी अहेरी शहर व तालुक्यात

अहेरी : अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्यावतीने अहेरी जिल्हा घोषित करण्यात यावा, या मागणीसाठी १ आॅगस्ट रोजी बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी अहेरी शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच मुलचेरा, भामरागड तालुक्यात बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. मुलचेरा, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या तालुका मुख्यालयाचे अंतर गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून मोठे आहे. यामुळे या जिल्ह्याच्या विकासाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या चारही तालुक्यात उद्योग, सिंचन, विद्युत, शिक्षण, आरोग्य व बेरोजगारीची समस्या आहे. यामुळे या तालुक्यातील नागरिक विकासापासून तसेच शासकीय योजनांपासून वंचित आहेत. विकासासाठी अहेरी हा स्वतंत्र जिल्हा निर्माण होणे काळाची गरज आहे, असा निर्धार करून या परिसरातील नागरिकांनी बंदमध्ये सहभाग घेतला. शासनाने यापूर्वी वाशिम, नंदूरबार, गोंदिया आदी जिल्ह्याची निर्मिती केली. तसेच नुकताच पालघर जिल्हा घोषित केला. त्यामुळे आता १५ आॅगस्टपर्यंत अहेरी जिल्ह्याची घोषणा करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अहेरी येथे मुख्य रस्त्यावर टायर जाळून रास्तारोको करण्यात आला. आॅटो चालकांनी आॅटो रिक्षा वाहतूक बंद ठेवून बंदला पाठिंबा दर्शविला. तालुक्यातील देवलमरी येथेही आॅटो रिक्षा व शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आले होते. अहेरी येथील बंद आंदोलनात कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे, अतुल उईके, विलास रापर्तीवार, पवन कोसरे, अजय चौधरी, मनोज मडावी, श्रीनिवास मेश्राम, मुकेश कोसरे, सुरज कोसरे यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुलचेरा येथील बंदमध्ये बादल शहा, सुभाष दलपती, मनोज कर्मकार, रवी दुर्गे, शंकर हलदार, ओपू मुजूमदार, दीपक परचाके, गणेश बंकावार, दिनेश पेंदाम, नरेश मलिक, वीजू डोर्लीकर, कृष्णा हलदार, बुद्धी विश्वास, मांतेश पाल, बासू घरोधर, राबीन शहा, निखिल ईज्जतदार, सुभाष पाल तसेच भामरागड येथे झालेल्या आंदोलनात आशिफ सुफी, प्रदीप कर्माकार, ज्योतींदा डे, अक्रमखान पठाण, बहादूर आलाम, चित्तरंजन बाला, रहेमान शेख, संतोष बडगे, रमेश मारगोनीवार आदींसह शेकडो नागरिक उपस्थित झाले होते.शुक्रवारी जिल्हाभरात नागपंचमीचा सण साजरा करण्यात आला. मात्र सणाच्या दिवशीही स्वतंत्र अहेरी जिल्ह्याच्या मागणीसाठी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला अहेरी, मुलचेरा, भामरागड आदी तालुक्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)