शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Coronavirus: निवडणुकीला स्थगिती; पण आचारसंहितेचे सावट कायम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 18:10 IST

प्रशासन संभ्रमात; आयोगाकडे मागितले मार्गदर्शन 

गडचिरोली: कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीला अखेर राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली. पण नव्याने ही प्रक्रिया सुरू होईपर्यंत निवडणुकीची आचारसंहिता उठवण्यासंदर्भात कोणतेही स्पष्ट निर्देश नसल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा संभ्रमात पडली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने आयोगाकडे मार्गदर्शन मागितले आहे.राज्यातील १९ जिल्ह्यांमधील १५७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्या ३१ मार्च रोजी मतदान होणार होते. पण प्रचाराची रणधुमाळी, मतदान आणि मतमोजणीसाठी होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी सदर निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित ठेवण्याचा आदेश दि.१७ ला निवडणूक आयोगाने संबंधित जिल्हा प्रशासनाला दिला.निवडणुकीच्या नियोजित कार्यक्रमानुसार दि.१६ ही नामांकन दाखल करण्याची शेवटची मुदत होती.  तोपर्यंतची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. पण नामांकनांची छाननी होऊन वैध-अवैध नामांकन ठरवणे, त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणे आणि प्रत्यक्ष मतदान व मतमोजणी हे महत्वाचे टप्पे बाकी आहेत.

पुन्हा नामांकन भरण्याची गरज नाहीकोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर ज्यावेळी निवडणुकीची पुढील प्रक्रिया सुरू होईल त्यावेळी उमेदवारांना नव्याने नामांकन दाखल करण्याची गरज पडणार नाही, असे गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी स्पष्ट केले. याचा अर्थ संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नव्याने होणार नसून ज्या टप्प्यावर प्रक्रिया थांबविली तेथून ती पुढे सुरू होणार आहे.

निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेला स्थगिती देताना आयोगाने आचारसंहिता उठवायची की ठेवायची, याबाबत स्पष्ट निर्देश दिलेले नाही. निवडणूक आयोगाला यासंदर्भात पत्र देऊन मार्गदर्शन मागविले आहे. अद्याप आयोगाकडून त्याबाबतचे मार्गदर्शन मिळालेले नाही.- दीपक सिंगला, जिल्हाधिकारी, गडचिरोली 

टॅग्स :Electionनिवडणूक