शहरं
Join us  
Trending Stories
1
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
2
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
3
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
4
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
5
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
6
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
7
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
8
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
9
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
10
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
11
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
12
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
13
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
14
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
15
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
16
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
17
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
18
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
19
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
20
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार

मविआ सरकारला शेतकऱ्यांपेक्षा बेवड्यांची जास्त चिंता; फडणवीसांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2022 4:21 PM

या सरकारमध्ये भ्रष्टाचाराची २०-२० मॅच सुरू आहे. दोन्ही टीम यांच्याच असून दोघेही हवा तितका भ्रष्टाचार करत आहेत. तू जास्त खातो की मी जास्त खातो ची चढाओढ सुरू आहे.

गडचिरोली : महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांपेक्षा बेवड्यांची जास्त चिंता आहे. या सरकारने गरिबांच्या तोंडचा घास काढून घेतला, असा जोरदार हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला. मविआ सरकार हे भ्रष्टाचारी, घोटाळेबाज आणि अत्याचारी असल्याचेही ते म्हणाले.

ते आज गडचिरोलीत आजोजित एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून मविआ सरकारला धारेवर धरले. या सरकारमध्ये भ्रष्टाचाराची २०-२० मॅच सुरू आहे. दोन्ही टीम यांच्याच असून दोघेही हवा तितका भ्रष्टाचार करत आहेत. तू जास्त खातो की मी जास्त खातो ची चढाओढ सुरू आहे. यांचा जिथे जाऊ, तिथे खाऊ आपण सगळे भाऊ-भाऊ असा यांचा नारा आहे, असे फडणवीस म्हणाले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी, मविआ सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांची वीज तोडण्याचा प्रयत्न या सरकारकडून सुरू आहे. शेतकऱ्यांच्याबाबतीत हे सरकार संवेदनहीन आहे. कोरोनाकाळात या सरकारने बारमालकांना मदत केली. विदेशी दारूवरचा ५० टक्के कर माफ केला. पण त्यांना शेतकऱ्यांचा विचार आला नाही. या महाराष्ट्रात बेडव्यांच सरकार आलं त्यांना शेतकऱ्यांची चिंता नाही, असे सुधीर मुंनगंटीवार म्हणाले होते. त्यांचं म्हणणं बरोबर असल्याचे दिसून येते, असेही फडणवीस म्हणाले. 

आमच्या सरकारच्या काळात आम्ही दरवर्षी वेळेवर शेतकऱ्यांना बोनस दिलं. आता धानाच्या खरेदीचे सेंटर हे कुठे असतात, कधी निघतात, कोणाला मिळतात याबाबत काही सांगण्याची गरज नाही. या सत्तापक्षाचे सगळे नेतेच या धान खरेदी सेंटरचे मालक होत असून त्यातून वेगळा भ्रष्टाचार सुरू आहे. पण, आमच्या शेतकऱ्याला धानाच बोनस द्यायला हे सरकार तयार नाही. विदर्भातील पाच आणि कोकणातील तीन जिल्ह्यांनाच द्यायचे आहे, हे सुद्धा त्यांना देता येत नाही, असा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला. 

या सरकारने वेश्यांना द्यायच्या पैशातही डल्ला मारला. वेश्यांच्या पैशात डल्ला मारणाऱ्यांना काय म्हणतात हे मी सांगणार नाही, तो शब्द संजय राऊत नेहमी वापरतात. तोच शब्द या सरकारसाठी वापरावा लागेल, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी