शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
2
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
3
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
4
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
6
IND vs BAN T20 : ऋतुराज गायकवाडला पुन्हा डच्चू! चाहत्यांचा रोष; चांगली कामगिरी असूनही वगळलं
7
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
8
"CSK च्या चाहत्यांसाठी दुःखाची बाब आहे पण...", गंभीरची जागा घेताच ड्वेन ब्राव्हो भावुक
9
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
10
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
11
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
12
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
13
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
14
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
15
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
16
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
17
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
18
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
19
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
20
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार

मरण झाले स्वस्त; रस्ते अपघातात ५९ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 4:25 AM

गडचिराेली : वाहनांच्या वाढत्या संख्येबराेबरच अपघातांची संख्या वाढत चालली आहे. जानेवारी ते जून या जेमतेम सहा महिन्यांच्या कालावधीत सुमारे ...

गडचिराेली : वाहनांच्या वाढत्या संख्येबराेबरच अपघातांची संख्या वाढत चालली आहे. जानेवारी ते जून या जेमतेम सहा महिन्यांच्या कालावधीत सुमारे ५९ जणांचा जीव गेला आहे, तर ८४ जण गंभीर, तर ३२ जण किरकाेळ जखमी झाले आहेत.

मागील काही वर्षांत दुचाकी, चारचाकी व मालवाहू वाहनांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या तुलनेत रस्ते रुंद करण्यात आले नाहीत, तसेच रस्त्यांची वेळाेवेळी दुरुस्ती केली जात नाही. वाहनधारक वाहन चालविण्याचे नियम पाळत नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. काेराेनाच्या महामारीत काेराेनामुळे अनेकांचा जीव गेला. त्याचबराेबर अपघातामुळेही अनेकांना प्राण गमवावा लागला आहे. १५ एप्रिल ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काेराेनामुळे लाॅकडाऊन हाेते, तर जानेवारी ते एप्रिलपर्यंत काेणतीही बंधणे नव्हती. मात्र, या कालावधीत ५९ जणांचा जीव गेला आहे. यामध्ये ५० पुरुष व ९ महिलांचा समावेश आहे. जखमी झालेल्यांमध्ये ८९ पुरुष व २७ महिलांचा समावेश आहे.

बाॅक्स....

लाॅकडाऊनमध्ये अपघात कमी

काेराेनामुळे १५ एप्रिल ते १ जूनपर्यंत लाॅकडाऊन हाेता. या कालावधीत केवळ मालवाहू वाहनांना परवानगी देण्यात आली हाेती, तसेच आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडता येत हाेते. या कालावधीत जिल्ह्यात शेकडाे नागरिकांचा काेराेनामुळे मृत्यू झाला. या कालावधीत लग्नसमारंभ बंद हाेते. जिल्हाबंदी हाेती. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडत नव्हते. त्यामुळे अपघात कमी झाले.

बाॅक्स...

पायी चालणाऱ्यांनाही धाेका

पायी चालणाऱ्या व्यक्ती रस्त्याच्या बाजूने चालतात. त्यांना वाहनाने धडक दिल्यानेसुद्धा मृत्यू झाले आहेत. विशेष करून सकाळच्या सुमारास फिरायला जाणाऱ्या व्यक्तींचा जीव गेला आहे. त्यामुळे राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गावर पायी जातानाही धाेका आहे.

बाॅक्स...

मृतकांमध्ये सर्वाधिक तरुणांचा समावेश

तरुणांमध्ये दुचाकी वाहने वेगाने चालविण्याची क्रेेझ आली आहे. विविध कंपन्यांची सुसाट वेगाने पळणारी वाहने उपलब्ध आहेत. तरुण वर्ग अशी वाहने खरेदी करण्यास पसंती दर्शवितात. त्यामुळे युवक अपघाताचे सर्वाधिक बळी ठरत आहेत.

बाॅक्स...

या ठिकाणी वाहने हळू चालवा

मार्ग चांगला असल्यास अतिशय वेगात वाहन चालविले जाते. जिल्ह्यात काही ठिकाणी वळण आहेत. वळणामुळे समाेरचे वाहन अगदी जवळ आल्याशिवाय दिसत नाही, तसेच आपले वाहन वळवितेवेळी ते उजव्या बाजूला जाते. अशावेळी दाेन वाहनांची धडक हाेऊन अपघात घडले आहेत. त्यामुळे वळणाच्या ठिकाणी वाहनाचा वेग कमी असणे आवश्यक आहे.

बाॅक्स...

वेळ मौल्यवान, पण जीवन अमूल्य !

काही नागरिकांना अतिशय वेगाने वाहन चालविण्याची सवय असते. जेवढ्या वेगाने वाहन धावेल तेवढाच अपघाताचा धाेका वाढतो. त्यामुळे वाहन शक्यताे हळू चालवावे. मालवाहू वाहनसुद्धा वेगाने चालवू नये.

- संदीप डाेईजड, युवक

.....................

काेणतेही काम असल्यास वेळेपूर्वी निघाल्यास हळुवार पाेहाेचता येते. मात्र, काही नागरिक अगदी वेळेवर घरून निघतात. इच्छितस्थळी पाेहाेचण्यासाठी वाहनाचा वेग वाढविला जातो, हे धाेकादायक आहे.

- मयूर येरमे, युवक

बाॅक्स...

वर्ष जखमी मृत्यू

२०१८ ३२१ १५६

२०१९ २९३ १३२

२०२० २४२ १४२

२०२१ ११६ ५९