शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

पूरग्रस्तांना पालकमंत्र्यांकडून अन्नधान्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 11:54 PM

अतिवृष्टीने संसार उद्ध्वस्त झालेल्या आलापल्ली येथील २०० कुटुंबांना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडून एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य मदत म्हणून देण्यात आले.

ठळक मुद्दे२०० कुटुंबांना मदत : एक महिना पुरेल एवढे तांदूळ, डाळ व तेलाचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अतिवृष्टीने संसार उद्ध्वस्त झालेल्या आलापल्ली येथील २०० कुटुंबांना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडून एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य मदत म्हणून देण्यात आले.चार दिवसांपूर्वी अहेरी तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. पुराचे पाणी अहेरी, आलापल्ली व ग्रामीण भागातील काही नागरिकांच्या घरामध्ये शिरले होते. अचानक पाण्याचा वेढा झाला. त्याचबरोबर पूर आला, त्या दिवशी रात्रंदिवस मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे घरातील साहित्य बाहेर काढणे शक्य झाले नाही. परिणामी घरातील साहित्य व दैनंदिन वापराच्या वस्तू पुरामध्ये बुडाल्या. पाण्यामुळे अन्नधान्य खराब झाल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पंचनामे करून नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदत मिळणार असले तरी ही मदत मिळण्यासाठी बराच कालावधी आहे. पूरग्रस्त कुटुंब उपाशी राहू नये, ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी स्वखर्चातून आलापल्ली येथील पूरग्रस्तांना महिनाभर पुरेल एवढे तांदूळ, डाळ, तेल उपलब्ध वितरित केले. या मदतीमुळे सदर कुटुंबांना एक महिना सावरण्यास मदत होणार आहे.मदतीचे वितरण करतेवेळी अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, प्रकाश गुडेल्लीवार, भाजपा अहेरी तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, भाजपा युवा मोर्चा, जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार, अहेरी शहर अध्यक्ष मुकेश नामेवार, आलापल्ली शहर अध्यक्ष नागेश रेड्डी, फिरोज शेख, सलिम शेख, सागर डेकाटे, विनोद ठाकरे, पप्पू मदिवार, शंकर मगडीवार, नगरसेवक श्रीनिवास चटारे, मालू तोडसाम, गुड्डू ठाकरे, संदीप गुमुलवार उपस्थित होते.

टॅग्स :ministerमंत्री