शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नव्या वर्गाना परवानगी देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 23:55 IST

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये नव्याने इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात विमाशिसंच्या पदाधिकाऱ्यांनी थेट माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय गाठून त्यांना निवेदन दिले आहे.

ठळक मुद्देपाचवी व आठवीच्या वर्गाबाबत निवेदन : विमाशिसंच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये नव्याने इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात विमाशिसंच्या पदाधिकाऱ्यांनी थेट माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय गाठून त्यांना निवेदन दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की, शैक्षणिक सत्र २०१८-१९ च्या समाप्तीनंतर इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थी इयत्ता पाचवीत तर इयत्ता सातवी उत्तीर्ण विद्यार्थी इयत्ता आठवीत नजीकच्या शाळांमध्ये प्रवेश घेतात. मात्र शैक्षणिक सत्र २०१९-२० पासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व खासगीव्यवस्थापनांच्या काही शाळांमध्ये नव्याने इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग सुरू करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. आरटीईनुसार पुढील शिक्षण घेण्याची सोय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असल्याने नव्याने तुकडी सुरू करण्याची आवश्यकता नाही. याचा परिणाम अनुदानित शाळांच्या इयत्ता पाचवी व आठवीच्या तुकड्यांवर होत आहे. त्या तुकड्यांवरील शिक्षक अतिरिक्त ठरतात. परिणामी शिक्षक समायोजनाची समस्या निर्माण होते. त्यामुळे नजीकच्या परिसरात प्रस्थापित अनुदानित शाळांच्या पटसंख्येवर परिणाम होऊ नये, यासाठी नवीन वर्ग तुकड्यांना परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे. उपशिक्षणाधिकारी रमेश उचे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी विमाशिसंचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, जिल्हाकार्यवाह अजय लोंढे, नरेंद्र भोयर, सुरेंद्र मामिडवार, अरविंद उरकुडे, रेवनाथ लांजेवार, प्रकाश तालम आदी उपस्थित होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र