शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

१९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा बिगुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 1:14 AM

आॅक्टोबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या १९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला आहे. त्यामुळे या गावांमध्ये राजकीय वातावरण तापायला लागले आहे.

ठळक मुद्दे२६ सप्टेंबरला मतदान : कोरची, धानोरा, अहेरी, एटापल्लीतील गावे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आॅक्टोबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या १९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला आहे. त्यामुळे या गावांमध्ये राजकीय वातावरण तापायला लागले आहे.कोरची तालुक्यातील पिटेसूर, मोठाझेलिया, धानोरा तालुक्यातील मुंगनेर, अहेरी तालुक्यातील आवलमरी, एटापल्ली तालुक्यातील सेवारी, सरखेडा, वडसा खुर्द, गर्देवाडा, वांगेतुरी, जवेली, मेंढरी बुज., भामरागड तालुक्यातील बोटणफुंडी कुव्वाकोडी, परायनार, फोदेवाडा, नेलगुंडा, धिरंगी, हेडरी व टेकल या १९ ग्रामपंचायींमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. एटापल्ली तालुक्यतील जांभिया येथे सरपंच पदाची थेट निवडणूक घेतली जाणार आहे. यासाठी निवडण्ूक विभागाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.सोमवारी २७ आॅगस्ट रोजी तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध केली. ५ ते ११ सप्टेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत संबंधित तहसील कार्यालयात नामनिर्देशनपत्र सादर करता येतील. १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजतापासून नामनिर्देशन पत्राची छाननी केली जाईल. १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक चिन्हांचे वाटप करून उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेतले जाईल. २७ सप्टेंबर रोजी मतमोजणी होईल.लोकशाहीसाठी निवडणुका या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्याचा अमूल्य अधिकार बहाल करण्यात आला आहे. गावाच्या विकासासाठी निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने कुणाच्याही दबावाला बळी न पडता मतदान करावे, तसेच ग्रामपंचायत सदस्यपदासाठी जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज दाखल करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.बहुतांश ग्रामपंचायती दुर्गम भागातीलज्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, त्यातील बहुतांश ग्रामपंचायती दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील आहेत. नक्षल चळवळीचा प्रभाव कमी झाला असल्याचे दिसून येत असले तरी नक्षल प्रभावित गावांमध्ये निवडणुका घेणे पोलीस व निवडणूक प्रशासनासमोरचे मोठे आवाहन आहे.निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच गावातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे जनतेतून सरपंचाची निवड करायची आहे. त्यामुळे या निवडणुकीबाबत मतदारांना विशेष उत्सुकता आहे. ग्रामपंचायत सदस्यांच्या तुलनेत सरपंच पदासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या वाढणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत