शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
2
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
3
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
4
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
5
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
6
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
7
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप
8
कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास
9
सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेल्या अपक्ष आमदाराला महायुती, मविआत प्रवेश बंदी, काय घडलं?
10
IND vs NZ : कॅप्टन Tom Latham ची बॅट तळपली; न्यूझीलंडनं घेतलीये ३०१ धावांची आघाडी
11
दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले...
12
काय सांगता? महिन्याला १ लाख रुपये कमवतात भिकारी; स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही करतात वापर
13
Maharashtra Assembly 2024: मेघना बोर्डीकर विरुद्ध विजय भांबळे; जिंतूरमध्ये राजकीय गणित कसं?
14
पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु...
15
Sonu Sood : "आपला देश सुरक्षित"; बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर सोनू सूद रोखठोक बोलला!
16
कोकणात मविआमध्ये बंडखोरी, सावंतवाडीत अर्चना घारे-परब यांनी भरला उमेदवारी अर्ज
17
नाशिक शहरात एकही जागा काँग्रेसला नाही; इच्छुक ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात अपक्ष लढणार
18
रोहितच्या नावे लाजिरवाणा विक्रम; धोनी-विराटच्या कॅप्टन्सीत असं कधीच नाही घडलं
19
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
20
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे

यांत्रिक युगातही पारंपरिक जात्यावर पीठ व डाळ भरडाईची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 4:33 AM

चामोर्शी : तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाच्या वाढत्या वापराने मानवी जीवनशैली बदलत आहे. व्यक्ती आपले श्रम वाचविण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा ...

चामोर्शी : तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाच्या वाढत्या वापराने मानवी जीवनशैली बदलत आहे. व्यक्ती आपले श्रम वाचविण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करून सोयी-सुविधा मिळवीत आहे. पूर्वी ग्रामीण भागात पीठ तयार करणे, तसेच डाळ भरडाईसाठी दगडाच्या जात्यांचा वापर केला जायचा. शहरी भागातही ज्येष्ठ महिला त्याचा वापर करीत असत; परंतु कालांतराने शहरी भागातून जाते हद्दपार झाले. मात्र, ग्रामीण भागातील जात्याचा वापर अद्यापही कायम आहे. अद्यापही ज्येष्ठ महिला जात्यावर दळण अथवा भरडाईचे काम करताना दिसून येतात.

संयुक्त कुटुंब पद्धती कुटुंबाच्या विकासास पोषक होती. पहाटेपासूनच प्रत्येक सदस्य आपापली कामे करण्यास सुरुवात करायचा. दळण, कांडण यासह विविध कामे पहाटेपासूनच केली जात. महिला दळण व कांडणाचे काम करीत असत. यासाठी पारंपरिक जाते, उखळ, असायचे. जाते जमिनीत अर्धवट गाडलेले असायचे, तर उखळ जमिनीत पूर्णपणे गाडलेले असायचे. जवळपास अर्धा ते एक फूट खोल जमिनीत ते असायचे. कालांतराने कांडण्यासाठी लोखंडी खल बाजारात आले. या खलाचाही मोठ्या प्रमाणावर वापर ग्रामीण भागात होताना दिसून येतो. लग्नसमारंभात मसाल्याचे अथवा अन्य पदार्थ कांडण्यासाठी या साहित्याचा वापर केला जातो. दहा ते वीस वर्षांपूर्वी अनेक प्रकारचे पारंपरिक साहित्य वापरले जात होते; परंतु गावागावांत इलेक्ट्रॉनिक मिक्सर तसेच पीठगिरण्या, दालमिल यासारखी यंत्रे पोहोचल्याने पारंपरिक जाते व उखळ कालबाह्य झाले. जुन्या पिढीतील महिला आजही जाते, पाटे व उखळाचा वापर करतात; परंतु नव्या पिढीतील महिला पारंपरिक साहित्याचा वापर करीत नाहीत. त्या कमी श्रम व कमी वेळेत अधिक काम करण्यावर भर देतात, तर काही महिला श्रम वाचविण्यासाठी गिरणीवर पीठ दळतात, तसेच दालमिल संचावर भरडाई करतात. शहरी भागात तर याला बगलच दिली जाते. महिला रेडिमेड वस्तू खरेदीवर अधिक भर देतात, असे असले तरी आजही ग्रामीण भागात पारंपरिक साधनांवर दळण व भरडाईचे काम सुरू आहे. शहरातील नव्या पिढीला ही साधने माहीत नाहीत. त्यांना केवळ चित्र दाखवावे लागते; परंतु ग्रामीण भागात लहान मुलांना त्या साधनांविषयी आपसूकच माहिती मिळते. त्यांना याबाबत विशेष शिक्षण घेण्याची गरज नाही. स्वावलंबनाचे तत्त्व स्वीकारून महिला आजही जात्यावर दळण व भरडाईचे काम करीत आहेत. उन्हाळ्यात तर विविध पदार्थ तयार करण्याकरिता जाते, पाटे व उखळ आदी पारंपरिक साधनांचाच वापर केला जातो.

गीतांची मिळत हाेती साथ

महिला पारंपरिक गीत, गवळणी, लोकगीते, हास्यगीते त्याचप्रमाणे पाळणे गाऊन दळण व कांडणीचे काम करीत असत. गीत गायनामुळे महिलांना एक प्रकारची स्फूर्ती मिळायची, तसेच कामाला वेग यायचा. या काळात अजूनही अनेक पारंपरिक साहित्य जतन केले जाते. त्यामध्ये पाटा-वरवंटा, शेर, पायली, कुडव, मुसळाचा समावेश होता.