शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

विकासकामांची माहिती पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 10:45 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात असलेल्या केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. विकासकामांची गती वाढविली. तसेच राज्य सरकारनेही महाराष्ट्रात चार वर्षात भरीव कामगिरी केली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची व केलेल्या विकासकामांची माहिती घराघरात पोहोचवावी, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते यांनी कार्यकर्त्यांना केले.

ठळक मुद्देखासदारांचे कार्यकर्त्यांना आवाहन : गडचिरोलीत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात असलेल्या केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. विकासकामांची गती वाढविली. तसेच राज्य सरकारनेही महाराष्ट्रात चार वर्षात भरीव कामगिरी केली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची व केलेल्या विकासकामांची माहिती घराघरात पोहोचवावी, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते यांनी कार्यकर्त्यांना केले.स्थानिक इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्रामगृहात भाजप पक्षाची बैठक रविवारी पार पडली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने भाजपचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभा क्षेत्र प्रमुख बाबुराव कोहळे, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, जिल्हा उपाध्यक्ष दामोधर अरीगेला, डॉ. भारत खटी, महामंत्री श्रीकृष्ण कावनपुरे, बंडू झाडे, भांडेकर, समर्थ, जनार्धन साखरे आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी खा. अशोक नेते यांनी गडचिरोली तालुक्यातील भाजप पक्ष संघटनेचा प्रमुखांकडून आढावा घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले, प्रशासनाच्या वतीने सध्या नवीन मतदार नोंदणी सुरू आहे. मतदार यादीत नाव असलेल्या अनेक मतदारांची नावे यादीत समाविष्ट होण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी संबंधित नागरिकांना सहकार्य करावे. नावाची नोंद होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, जेणेकरून मतदारांच्या संख्येमध्ये वाढ होईल, असे सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला चार वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. केंद्र सरकारच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी जनधन विमा योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, स्वच्छ भारत अभियान व इतर अनेक योजना राबविण्यात आल्या. स्वच्छ भारत अभियानातून संपूर्ण भारतात ७.५ कोटी इतक्या शौचालयाचे बांधकाम केले. उज्वला योजनेमुळे ३.८ कोटी कुटुंब धूरमुक्त झाली, असे खा. अशोक नेते यांनी सांगितले.कार्यकर्ता महत्त्वाचा दुवाआगामी लोकसभेची निवडणूक लक्षात घेता भाजपने सक्ती केंद्र प्रमुख, मंडळ प्रमुख, पालक व बुथ प्रमुख या सर्वांवर जबाबदारी टाकली आहे. कार्यकर्ता हा पक्षाचा महत्त्वाचा दुवा असल्याने कार्यकर्त्यांनी बुथावर लक्ष केंद्रीत करून त्याअनुषंगाने पक्ष संघटनेचे काम केले पाहिजे, असे आवाहन बाबुराव कोहळे यांनी या बैठकीत भाषणातून केले.