शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय बापू, किती खोके?" ५ कोटी सापडल्यावर राऊतांचा आरोप, शहाजीबापू म्हणाले, "माझं नाव नाही"
2
लॉरेंस बिश्नोईचा एनकाउंटर करणाऱ्याला 1,11,11,111 रुपयांचे बक्षीस...! कुणी केली घोषणा? उडाली खळबळ
3
१२ दिवसांपूर्वीच लेकीचं लग्न, 6 दिवसांआधी डॉक्टरांना मिळाली नोकरी; दहशतवाद्यांनी घेतला जीव
4
Hyundai India Share Price : Hyundai IPO नं केली गुंतवणूकदारांची निराशा, पण ब्रोकरेज मात्र बुलिश; लिस्टिंगलाच दिलं 'इतकं' टार्गेट
5
क्राइम पेट्रोलमध्ये पोलीस अन् खऱ्या आयुष्यात हातात बेड्या! प्रेमात वेडी झाली अभिनेत्री, बॉयफ्रेंडच्या भाच्याचंच केलं अपहरण
6
अनिल देशमुख यांनी तुरुंगात लिहिले पुस्तक; लवकरच होणार प्रकाशन
7
Laxmi Pujan Muhurta 2024: यंदा लक्ष्मी पूजनाच्या दिवशी 'धनलाभ' मुहूर्तावर 'असे' करा विधिवत पूजन!
8
लॉरेन्स बिश्नोई आता विधानसभा निवडणूक लढवणार? कोणी दिली राजकारणात येण्याची ऑफर?
9
नांदेड, हिंगोली जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के, हदगावमध्ये केंद्रबिंदू; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
10
"रुग्णालयाखाली बंकर, लाखो डॉलर्सची रोकड आणि सोनं लपवतंय हिजबुल्लाह", IDF चा मोठा दावा
11
BRICS परिषदेसाठी PM नरेंद्र मोदी रशियाला रवाना; चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी होणार चर्चा?
12
रतन टाटांच्या 'त्या' बहिणी कोण, ज्या पूर्ण करणार त्यांची अंतिम इच्छा? प्रकाशझोतापासून आहेत दूर
13
अनिल कपूरने नाकारली कोटींची ऑफर, पान मसालाची जाहिरात करण्यास दिला नकार
14
मनसेची पहिली यादी आज? अमित ठाकरे, नांदगावकर, देशपांडे, जाधव यांची नावे निश्चित?
15
Share Market Today : शेअर बाजार सपोर्ट लेव्हलवर, दिवाळीपूर्वी होऊ शकते घसरण; अपर लेव्हलवर सेलर्स सक्रिय
16
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
17
Diwali 2024: 'या' वेळेत तळण  करा, पदार्थ तेल कमी पितील; जाणून घ्या त्यामागील शास्त्र!
18
मिका सिंगने कॉन्सर्टदरम्यान सलमानला धमकी देणाऱ्यांची केली बोलती बंद! म्हणाला- "भाई तू..."
19
शशांक केतकरच्या तक्रारीची BMC ने घेतली दखल! काहीच तासांत केली उपाययोजना; नेमकं प्रकरण काय?
20
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!

बियाणांसाठी शेतकऱ्यांच्या उड्या

By admin | Published: June 22, 2016 12:41 AM

१३ वने अंतर्गत जिल्हा परिषदेच्या मार्फतीने शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करून दिली जातात.

२५ लाखांची तरतूद : १३ वने योजनेत मागणीच्या तुलनेत कमी बियाणांचा पुरवठागडचिरोली : १३ वने अंतर्गत जिल्हा परिषदेच्या मार्फतीने शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करून दिली जातात. यावर्षी केवळ १ हजार ३२८ क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीच्या तुलनेत बियाणांचा पुरवठा अत्यंत नगन्य असल्याने बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड स्पर्धा दिसून येत आहे. त्यामुळे अनुदानित बियाण्यांचे प्रमाण वाढवावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.१३ वने महसुलांतर्गत जिल्हा परिषदेला महसूल प्राप्त होते. या महसुलापैकी काही महसूल शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणांचे वाटप करण्यासाठी वापरल्या जातो. गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे दोन लाख हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाते. यापैकी सुमारे दीड लाख हेक्टरवर धान पिकाची रोवणी केली जाते. त्यासाठी जवळपास २५ हजार क्विंटल धानाचे बियाणे आवश्यक आहे. बहुतांश शेतकरी आता घरचे बियाणे वापरण्याऐवजी खासगी कंपन्यांकडील किंवा महाबिजचे बियाणे वापरतात. मात्र या बियाणांची किमत मोठ्या प्रमाणात राहते. ३० किलोच्या धानाच्या बिजाईसाठी ७०० ते एक हजार रूपये मापावे लागतात. परिणामी सर्वच शेतकरी बियाणे खरेदी करू शकत नाही. जिल्हा परिषदेने यावर्षी अनुदानित बियाण्यांसाठी केवळ २५ लाख रूपयांची तरतूद केली होती. या तरतुदीतून १४९ क्विंटल सोयाबिन, १ हजार ३२८ क्विंटल धान व २२ क्विंटल तुरीचे बियाणे उपलब्ध करून दिले. मागणीच्या तुलनेत बियाणे अत्यंत कमी आहेत. त्यामुळे अनुदानित बियाण्यांसाठी पंचायत समितीमध्ये शेतकऱ्यांच्या उड्या पडत आहेत. बियाणे प्राप्त होताच ते खरेदीसाठी शेतकऱ्यांची रांग लागली आहे. जिल्हा परिषदेने बियाण्यांसाठी अधिकची तरतूद करून किमान पाच हजार क्विंटल तरी बियाणे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेने किमान पुढील वर्षी बियाण्यांसाठी अधिक तरतूद करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (नगर प्रतिनिधी)जास्त तरतुदीची गरजअनुदानावरील बियाण्यांसाठी जिल्हा परिषदेने २५ लाख रूपयांची तरतूद केली आहे. मात्र जिल्ह्यातील क्षेत्र लक्षात घेता ही तरतूद अत्यंत तुटपुंजी आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने यावरील तरतूद वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे अनुदानित बियाण्यांचा लाभ अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिला जातो. हे शेतकरी खासगी दुकानातून महागडे बियाणे खरेदी करू शकत नाही. त्यामुळे अनुदान वाढविणे गरजेचे आहे.