शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

आगीत रोपवन जळून नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 1:08 AM

वैरागड परिसरातील सुकाळा येथील वनविभागाच्या रोपवनाला आग लागल्याने हे रोपवन जळून नष्ट झाले. या घटनेमुळे वनविभागाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देउपग्रहावरून घेतात माहिती : सीमावादात अडकले वनाधिकारी व कर्मचारी

ऑनलाईन लोकमतवैरागड : वैरागड परिसरातील सुकाळा येथील वनविभागाच्या रोपवनाला आग लागल्याने हे रोपवन जळून नष्ट झाले. या घटनेमुळे वनविभागाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. मात्र जंगलातील वनवे रोखण्यासाठी वनाधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ठोस उपाययोजना होताना दिसून येत नाही. सीमावादात वनाधिकारी व कर्मचारी अडकल्याचे दिसून येत आहे.उन्हाळ्याच्या दिवसात वनक्षेत्रास आग लागणे ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून केंद्र सरकारने जाहीर केले आहे. मात्र यानंतरही जिल्ह्याच्या अनेक भागातील उभे जंगल आगीच्या भक्ष्यस्थानी सापडत आहे. अशा परिस्थितीत वनवे लागलेला जंगल आपल्या वनक्षेत्रात येत नाही, अशी बतावणी करून वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी उघड्या डोळ्यांनी हा प्रकार पाहत आहेत.जिल्ह्यातील वनक्षेत्रात लागणारे वनव्याचे नियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. मात्र वनव्याच्या नियंत्रणासाठी अधिकाºयांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. आरमोरी वनपरिक्षेत्रातील रामाळा बिटात चार वर्षांपूर्वी लावलेले रोपवन दिवसाढवळ्या जळून खाक झाले. लाखोंची वनसंपदा नष्ट झाली. मात्र वनव्यावर नियंत्रण मिळविण्यात वनविभागाला यश आले नाही. वडसा वनविभागातील आरमोरी, कुरखेडा, देलनवाडी, पुराडा, पोर्ला आदी वनपरिक्षेत्रातील बरेचसे जंगल जळून खाक झाले. मात्र वनाधिकारी सुस्त आहेत.वनव्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी फायरलाईनचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. पण या फायरलाईनचा वनवे नियंत्रणासाठी काहीच उपयोग झाला नाही. वनाधिकारी मार्च समाप्तीचे बिल काढण्यात व्यस्त आहेत.