शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
3
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
4
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
5
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
6
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
7
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
8
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
9
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
10
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
11
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
12
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
13
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
14
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
15
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
16
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
17
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
18
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
19
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
20
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका

‘कुलगुरू’ पद ओबीसींना द्या

By admin | Published: July 31, 2014 12:02 AM

गोंडवाना विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. विजय आर्इंचवार सेवानिवृत्त झाल्याने चार ते पाच महिन्यांपासून कुलगुरूचे पद रिक्त आहे. सध्य:स्थितीत कुलगुरू पदाचा कार्यभार गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे

रिक्त पद त्वरित भरा : राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाची मागणीगडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. विजय आर्इंचवार सेवानिवृत्त झाल्याने चार ते पाच महिन्यांपासून कुलगुरूचे पद रिक्त आहे. सध्य:स्थितीत कुलगुरू पदाचा कार्यभार गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. परंतु जिल्हाधिकारी हे प्रशासकीय प्रमुख असल्याने विद्यापीठाच्या कामात अधिकाधिक वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे विद्यापीठातील अनेक कामे वेळेत पूर्ण होऊ शकत नाही. विद्यापीठातील रिक्त असलेले कुलगुरूचे पद भरतांना जिल्ह्यातील ओबीसींना प्राधान्य देऊन कुलगुरूपदी ओबीसीची नियुक्ती करावी व रिक्त असलेले पद भरावे, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष एम. डी. चलाख यांनी राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातू केली आहे.गडचिरोली-चंद्रपूर हे दोन्ही जिल्हे शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत मागासलेले आहेत. जिल्ह्यातील तिनही आमदार आदिवासी आहेत. तसेच जिल्ह्यातील बहुसंख्य अधिकारी आदिवासी संवर्गाचे आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बहुसंख्येने असलेल्या ओबीसी समाजाला पुरेशा प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळत नाही. परिणामी ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात ओबीसींना शासकीय नोकरी व इतर कामात पुरेसे प्रतिनिधीत्व मिळत नसल्याने ओबीसी समाजाचा विकास खुंटला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ओबीसी समाजात नैराश्य पसरले आहे. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी समाजात अनेक तज्ज्ञ, उच्च विद्याविभूषित लोक आहेत. याबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीची जाण असणारे अनेक प्राध्यापक, डॉक्टरेट पदव्या प्राप्त करणारीही मंडळी भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे गुणवत्तेनुसार गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती होण्यास जिल्ह्यातील ओबीसी समाजातील अनेक उमेदवार सक्षम आहेत. त्यामुळे कुलगुरूचे रिक्त पद भरतांना ओबीसी समाजातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, असेही चलाख यांनी म्हटले आहे. प्रथम कुलगुरूपदी जिल्ह्यातील ओबीसी समाजातील उमेदवाराची नियुक्ती व्हावी, यासाठी ओबीसी बहुजन महासंघाच्यावतीने प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली होती. मात्र काही समाजाच्या राजकारण्यांनी ओबीसी समाजाची मागणी धुडकावून लावली होती. गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी ओबीसी उमेदवाराची नियुक्ती केल्यास संपूर्ण ओबीसी समाजासह इतर समाजालाही न्याय मिळू शकतो. विद्यापीठात नवनवीन अभ्यासक्रम लागू करण्यासाठी अभ्यासू व्यक्तीची कुलगुरूपदी निवड होणे आवश्यक आहे. जिल्ह्याचा विकास शिक्षणातूनच होऊ शकतो. यासाठी विद्यापीठ सक्षम असणे आवश्यक आहे. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी ओबीसींची नियुक्ती करावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष एम. डी. चलाख यांनी केली आहे.