शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

गोकुलनगर बायपास मार्गाची अवस्था बकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 12:29 AM

स्थानिक नगर पालिकेच्या हद्दीतील वर्दळीच्या अनेक मार्गाची गेल्या वर्षभरापासून प्रचंड दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर मार्गावरून गोकुलनगरकडून चामोर्शी मार्गाला जोडणाऱ्या बायपास रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून या खड्ड्यात पाणी साचले आहे.

ठळक मुद्देपालिका प्रशासन सुस्त : आवागमनासाठी वाहनधारकांची कसरत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक नगर पालिकेच्या हद्दीतील वर्दळीच्या अनेक मार्गाची गेल्या वर्षभरापासून प्रचंड दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर मार्गावरून गोकुलनगरकडून चामोर्शी मार्गाला जोडणाऱ्या बायपास रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून या खड्ड्यात पाणी साचले आहे. त्यामुळे आवागमनासाठी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. मात्र या गंभीर समस्येकडे नगर पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.गडचिरोली शहरातील गोकुलनगर बायपास, रेड्डीगोडाऊन बायपास, धानोरा मार्गावरून शिवाजी महाविद्यालयाकडून रेड्डी गोडाऊन चौकाला जोडणाºया मार्गाची बकाल अवस्था झाली आहे. सदर तिन्ही मार्गावर वाहनांची वर्दळ दिवसा व सायंकाळी मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय शहरातील कारमेल शाळेच्या मागील परिसरातील रस्ते खड्डेमय झाले असून पावसाळ्यात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होत असते. आता पावसाळा लागल्यामुळे या वस्तीतील अनेक रस्त्यांना दलदलीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. स्वामी विवेकानंद नगर व गोकुलनगर, चनकाई नगर व इतर भागातील रस्त्यांची अवस्था दयनिय आहे. सदर रस्त्यांची पक्की दुरूस्ती करण्यात यावी अथवा सिमेंट काँक्रीटीकरणाचे रस्ते पालिकेने तयार करावे, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून होत आहे. मात्र आवश्यक त्या ठिकाणी पक्के रस्ते तयार करण्याबाबत पालिका प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येते.शहरातील अनेक रस्त्यांचे डांबरीकरण उखडले आहे. लांझेडा, इंदिरा नगर, फुले वार्ड, बसेरा कॉलनी, शिक्षक कॉलनी व इतर बºयाच भागातील रस्त्यांची अवस्था वाईट आहे. शहरात अनेक वस्त्यांमध्ये पक्क्या नाल्यांचा अभाव आहे. पावसाळ्यात नाल्यातील सांडपाणी व पावसाच्या पाण्याने छोट्या नाल्या तुडूंब भरतात. सदर पाणी रस्त्यावरून वाहते. यामुळे रस्त्यांचीही दुरवस्था होत आहे. पालिकेच्या नियोजनशुन्य कारभाराने नागरिक त्रस्त झाले आहेत.चिखलमय रस्त्यावर मुरूम पडण्यास एक महिना लागणारगडचिरोली नगर पालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्याच्या सुरूवातीला चिखल निर्माण होणाºया अंतर्गत रस्त्यावर मुरूम टाकून आवागमनासाठी नागरिकांची सुविधा केली जाते. मात्र यंदा पालिका प्रशासनाच्या वतीने मुरूम टाकण्याच्या कार्यवाहीत बराच विलंब होत आहे. सदर कार्यवाहीसाठी सुरूवातीला न.प.च्या सभेत ठराव पारित करावा लागतो. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवावी लागते. मात्र प्रशासनाच्या वतीने अद्यापही मुरूमाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली नाही. टेंडर न झाल्याने अंतर्गत चिखलमय रस्त्यावर प्रत्यक्ष मुरूम पडण्यास आणखी एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस