शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

विसापुरात अस्वच्छतेचे साम्राज्य, कचऱ्याचे ढीग, घंटागाडी केव्हा येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 14:57 IST

नागरिकांचा सवाल : नगरसेवक नाही, तक्रार करायची कुणाकडे?

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : स्थानिक नगरपरिषद प्रशासनाद्वारे शहरातील सर्वच वार्डात स्वच्छ शहर, समृद्ध शहर असा डंका पिटवत स्वच्छतेबाबत पाठ थोपटली जात आहे. मात्र, दुसरीकडे शहरातील काही वार्डात अस्वच्छतेमुळे नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. न. प. हद्दी अंतर्गत येत असलेल्या विसापूर येथे सर्वत्र अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून वार्डा वार्डात पसरलेल्या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे नगर पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन स्वच्छता करावी, अशी मागणी रहिवासी यांच्याकडून होत आहे.

नगर पालिका हद्दीत विसापूर हा भाग येत असून या गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे. विसापूर-कोटगल या मुख्य मार्गावरच कचरा पसरल्याने येथे ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याच मार्गावर नगर परिषदेची शाळा सुरू आहे. तसेच प्रशासनाने या गावात अनेक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. गावात रस्ते, नाले, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून ही उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र दुसरीकडे नगर परिषदेची कचरा उचलणारी वाहने गावात नियमित पोहोचत नसल्याने गावात कचरा पसरला आहे. विशेषतः विसापूर-कोटगल रस्त्यावर रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. त्यामुळे आवागमन करणाऱ्या नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

या संदर्भात ग्रामस्थांनी अनेकदा नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र, न. प. च्या उदासीनतेमुळे समस्या 'जैसे थे'च आहे. नगरपरिषद प्रशासनाने याकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीGarbage Disposal Issueकचरा प्रश्न