शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

शहिदांना वाहिली आदरांजली

By admin | Published: September 24, 2016 3:14 AM

जम्मू-काश्मिर राज्याच्या उरी क्षेत्रात लष्कर तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने यात २० जवान शहीद झाले.

उरी हल्ल्याचा निषेध : बेतकाठी व आलापल्लीत कार्यक्रमगडचिरोली/कोरची/आलापल्ली : जम्मू-काश्मिर राज्याच्या उरी क्षेत्रात लष्कर तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने यात २० जवान शहीद झाले. या दहशतवादी हल्ल्याचा जिल्ह्यातील विविध भागात निषेध केला जात आहे. गडचिरोली, कोरची तालुक्याच्या बेतकाठी व अहेरी तालुक्याच्या आलापल्ली येथे पाकिस्तानचा निषेध करून शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली.गडचिरोली येथील फुले-आंबेडकर कॉलेज आॅफ सोशल वर्कच्या वतीने महिला महाविद्यालयात शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. खंगार, प्रा. डॉ. दिलीप बारसागडे, प्रा. व्ही. एस. गोर्लावार, प्रा. गहाणे, प्रा. किशोर कुडे, प्रा. लाकडे, प्रा. गौर, प्रा. निंबाळकर, प्रा. प्रज्ञा वनमाळी, प्रा. बुटले, ग्रंथालय विभाग प्रमुख वर्षा तिडके उपस्थित होत्या. यावेळी दोन मिनीटे मौन पाळून शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर पुष्प अर्पण करण्यात आले. यशस्वीतेसाठी शुभम दागमवार, प्रमोद भोयर, प्रकाश कुनघाडकर, भावना लांजेवार, कल्याणी बोरकर व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.कोरची तालुक्याच्या बेतकाठी येथे ग्रामस्थांच्या वतीने पाकिस्तान सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मेनबत्ती जाळून शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सुरेश काटेंगे, रामटेके, राजकुमार नाईक, नागपुरे, वीरेंद्र आदे, विनोद कोरेटी, वासनिक, उसेंडी, पुस्तोडे, बोरकर, कन्नाके, कचलाम, गायधनी, प्रकाश नैताम, माजी सैनिक विलास गजभिये, गहाणे, खुणे उपस्थित होते. आलापल्ली येथील वीर बाबुराव शेडमाके चौकात नागरिक व राजे धर्मराव हायस्कूल, राणी दुर्गावती विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वतीने दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी महेश रापर्तीवार, प्रतीक खोब्रागडे, अक्षय माडोरे, स्वप्नील श्रीरामवार, हसन पठाण, अनिल जंगमवार, श्रीनिवास गडमवार व शिक्षक उपस्थित होते. यावेळी गावातील नागरिकांनी पाकिस्तानचा निषेध केला. (लोकमत वृत्तसेवा)