शहरं
Join us  
Trending Stories
1
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
2
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
3
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
4
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
5
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
6
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
7
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
8
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
9
जेव्हा रितेशने जिनिलीयासोबत केलेलं ब्रेकअप, अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था, म्हणाली- "त्याने मला मेसेज करून..."
10
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
11
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
12
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
13
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
14
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
15
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
16
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
17
Weightloss Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
18
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
19
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
20
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS

वाहनांच्या गर्दीत पायी चालायचे कसेे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 4:24 AM

गडचिराेली : शहरातील चामाेर्शी मार्ग एका बाजूने खाेदून ठेवला आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी एकच बाजू उपलब्ध आहे. या मार्गावरून चारचाकी, ...

गडचिराेली : शहरातील चामाेर्शी मार्ग एका बाजूने खाेदून ठेवला आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी एकच बाजू उपलब्ध आहे. या मार्गावरून चारचाकी, दुचाकी, ट्रेलर, ट्रक, ट्रॅक्टर, एसटी व इतर मालवाहू वाहनांची रात्रंदिवस वर्दळ राहते. अशातच मार्गाच्या बाजूला दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. दुकानदारांचे ग्राहक रस्त्यावरच चारचाकी, दुचाकी वाहने ठेवतात. अशा परिस्थितीत या मार्गाने पायी कसे चालावे, असा प्रश्न पायी चालणाऱ्या व्यक्तींना पडला आहे.

वर्षभरापूर्वी गडचिराेली शहरातून चामाेर्शी मार्गाच्या सिमेंट काॅंंक्रिटीकरणाला सुरूवात झाली. कंत्राटदाराने एक बाजू बनवून ठेवली आहे. दुसऱ्या बाजूचे काम मागील आठ महिन्यांपासून रखडले आहे. आठ महिन्यांपासून मार्ग खाेदून ठेवला असल्याने या ठिकाणी माेठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. बाजूच्या नागरिकांना ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गडचिराेली शहरातील हा मुख्य मार्ग असल्याने या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. सर्वच वाहने एका बाजूच्या मार्गाने जात असल्याने वाहनांची गर्दी हाेऊन वाहतूक काेंडी हाेते. पायी चालणाऱ्या व्यक्तींना तर मार्गच शिल्लक राहत नाही. जीव धाेक्यात घालून मार्गाच्या बाजूने जावे लागते. अशातच मागून किंवा पुढून एखादा वाहनधारक ठाेकून अपघात करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बाॅक्स....

ग्राहकांची वाहने रस्त्यावर

दुकानदारांनी रस्त्यापर्यंत अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहनांना पार्किंगसाठी जागाच शिल्लक राहिली नाही. परिणामी दुकानांमध्ये येणारे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी ठेवतात. या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण हाेत आहे.

बाॅक्स...

हजाराे वाहनांची वर्दळ

चामाेर्शी मार्गावर शाळा, महाविद्यालये, दुकाने, निमशासकीय व खासगी कार्यालये आहेत. तसेच शहरातील २५ टक्के वस्तीमध्ये या मार्गाने प्रवेश करता येते. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. दरदिवशी हजाराे वाहने रस्त्यावरून ये-जा करतात. सध्या काेराेनामुळे निर्बंध असले तरी या मार्गावरील वर्दळ कमी झाली नाही.

बाॅक्स..

बाजूचे नागरिक त्रस्त

ज्या बाजूने रस्ता खाेदून ठेवला आहे, त्याच्या बाजूला अनेक घरे आहेत. आठ महिन्यांपूर्वी रस्ता खाेदला. मात्र बांधकाम अजूनही केले नाही. आता मुरूम पसरविण्याचे काम सुरू आहे. तेही अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे रस्त्याच्या पलीकडे वास्तव्याने राहत असलेल्या नागरिकांचे माेठे हाल आहेत. घरापर्यंत दुचाकी किंवा चारचाकी वाहन जाऊ शकत नसल्याने ही वाहने दुसऱ्याच्या घरी ठेवावी लागत आहेत.

काेट...

पायी चालायला वाटते भीती

कामात एवढी दिरंगाई करणारा कंत्राटदार अजूनपर्यंत आपण बघितला नाही. सहा महिन्यांपासून रस्ता खाेदून ठेवला आहे. मात्र काम अतिशय संथगतीने सुरू आहे. सदर कंत्राटदाराची काम करण्याची इच्छा नसेल तर त्याच्याकडून काम काढून ते दुसऱ्या कंत्राटदाराला देण्यात यावे. गडचिराेली शहरातील नागरिक शांत आहेत. याचा गैरफायदा कंत्राटदार घेत आहे. विशेष म्हणजे लाेकप्रतिनिधीसुद्धा शांत आहेत. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- सुनील किलनाके, नागरिक