शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
2
IND vs NZ: न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात ३ मोठे बदल, स्टार खेळाडूचं साडेतीन वर्षांनी 'कमबॅक
3
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
4
कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा
5
Priyanka Gandhi Networth : शेतजमीन, पीपीएफ, म्युच्युअल फंड्स; प्रियांका गांधींची गुंतवणूक नक्की कुठे-कुठे; किती कोटींच्या मालकीण?
6
सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा
7
सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल
8
लेक ट्विंकलसोबत फोटो काढण्यास डिंपल कपाडियांचा नकार, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "जया बच्चन..."
9
बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट जूनमध्ये शिजला होता; अकराव्या आरोपाली ठोकल्या बेड्या
10
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
11
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
12
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
13
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
14
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
15
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
16
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
17
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
18
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
19
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
20
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य

तीन वर्षांत वाघ-बिबट्यांनी घेतला तब्बल 26 जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2022 5:00 AM

३० वर्षांपूर्वी जिल्ह्यात वाघांचा काही प्रमाणात वावर हाेता; परंतु कालांतराने शिकारी वाढल्याने  व काही वाघ स्थलांतरित झाल्याने जंगलात वाघ दिसेनासे झाले. केवळ बिबट व अस्वल आदी हिंस्त्र प्राण्यांचा वावर हाेता. ब्रह्मपुरी वनक्षेत्रातून अनेक वाघ जिल्ह्यात स्थलांतरित व्हायचे; परंतु पुन्हा पावसाळ्यापूर्वी ते चंद्रपूर जिल्ह्यात परत जात असत. मात्र, चार वर्षांपूर्वी देसाईगंज तालुक्यात दाखल झालेले वाघ हळूहळू जिल्ह्याच्या अनेक भागांत पसरून स्थायिक झाले आहेत.

गोपाल लाजूरकरलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : वनाच्छादित गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून मानव-वन्यजीव संघर्ष सुरू झाला आहे. अलीकडच्या दोन वर्षांत तो अधिक वाढल्याचे दिसून येते. जानेवारी २०१९ पासूनच्या घटनांमध्ये या जिल्ह्यात २६ लाेकांचा वाघ व बिबट्यांनी बळी घेतला आहे. यामध्ये २१ जणांना वाघांनी, तर पाच जणांना बिबट्यांनी ठार केले. गडचिराेली जिल्ह्यात ७६ टक्के वनक्षेत्र आहेत. ३० वर्षांपूर्वी जिल्ह्यात वाघांचा काही प्रमाणात वावर हाेता; परंतु कालांतराने शिकारी वाढल्याने  व काही वाघ स्थलांतरित झाल्याने जंगलात वाघ दिसेनासे झाले. केवळ बिबट व अस्वल आदी हिंस्त्र प्राण्यांचा वावर हाेता. ब्रह्मपुरी वनक्षेत्रातून अनेक वाघ जिल्ह्यात स्थलांतरित व्हायचे; परंतु पुन्हा पावसाळ्यापूर्वी ते चंद्रपूर जिल्ह्यात परत जात असत. मात्र, चार वर्षांपूर्वी देसाईगंज तालुक्यात दाखल झालेले वाघ हळूहळू जिल्ह्याच्या अनेक भागांत पसरून स्थायिक झाले आहेत.२७ जानेवारी २०१९ राेजी आरमाेरी तालुक्याच्या उसेगाव येथील एका व्यक्तीला वाघाने ठार केल्याची पहिली घटना नोंदविल्या गेली. २० जानेवारी २०२२ राेजी आरमाेरी तालुक्याच्या कुरंझा येथे शेवटची व्याघ्रबळीची घटना घडली. गेल्या दोन महिन्यांत अशा घटनांची नोंद नसली तरी तीन वर्षांत २१ जणांचा वाघाने आणि ५ जणांचा बिबट्याने बळी घेतला. त्यात वन विभागाच्या क्षेत्रात १८, वनविकास महामंडळाच्या (एफडीसीएम)च्या क्षेत्रात ७, तर आलापल्ली वन्यजीव क्षेत्रातील एका घटनेचा समावेश आहे.

काेणत्या कारणांनी गेला बळी?-    गडचिराेली जिल्ह्यात भरपूर प्रमाणात वनक्षेत्र असल्याने वनाेपजावर लाेकांचे जीवन अवलंबून आहे. माेहफूल वेचणी, सरपण गाेळा करणे, गुरे चारणे, तेंदूपत्ता संकलन, तसेच जंगलालगतीची शेती कसत असताना त्यांचा जंगलाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संबंध येतो. सर्वाधिक बळी सरपण गाेळा करताना आणि शेतातील कामासाठी जात असताना किंवा शेतात कामे करीत असताना वाघांनी घेतला.-    देसाईगंज, गडचिराेली, आरमाेरी तालुक्यात आढळणारे वाघ आता आलापल्ली व सिराेंचापर्यंत सुद्धा पाेहाेचले आहेत.

किती जणांना मिळाले १५ लाख?वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या कुटुंबाला १५ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाते. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत २६ बळींपैकी आतापर्यंत २४ जणांना १५ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले. मुलचेरा तालुक्यातील येल्ला व सिराेंचा तालुक्यातील पेंटिपाकातील बिबटबळीच्या कुटुंबाच्या अनुदानाचा प्रस्ताव प्रलंबित आहे.

 

टॅग्स :Tigerवाघ