शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

शिक्षणातून श्रम हद्दपार करणे ही मोठी चूक; कादंबरीकार राजन गवस यांचे शिक्षण व्यवस्थेवर आसूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 14:11 IST

राजन गवस यांनी स्वातंत्र्योत्तर काळातील शैक्षणिक धोरणातील चुका प्रकर्षाने मांडून आज वाढलेल्या बेरोजगारीसाठी त्या कशा कारणीभूत आहेत हे मांडले

गडचिरोली : आज शेतकऱ्यांना शेतात राबण्यासाठी मजूर मिळत नाहीत. दुसरीकडे युवा वर्ग रिकामा फिरताना दिसतो. शिक्षणाला श्रमाची जोड देणे गरजेचे आहे, पण आपल्या शिक्षणातून श्रम ही गोष्ट हद्दपार केली, ही सर्वात मोठी चूक आहे. त्याचे परिणाम आपण भोगत आहोत, अशा शब्दात ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस यांनी शैक्षणिक धोरणावर आसूड ओढले.

गडचिरोलीत दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात मंगळवारी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पद्मश्री डॉ. अभय बंग, तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, तसेच रा.तु.म.नागपूर विद्यापीठाचे सेवानिवृत्त मराठी विभागप्रमुख प्रा. प्रमोद मुनघाटे आणि प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे मंचावर विराजमान होते. यावेळी राजन गवस यांनी स्वातंत्र्योत्तर काळातील शैक्षणिक धोरणातील चुका प्रकर्षाने मांडून आज वाढलेल्या बेरोजगारीसाठी त्या कशा कारणीभूत आहेत हे मांडले. शिक्षणाच्या व्यवस्थेलाच कॅन्सर झाला आहे, अशा शब्दात त्यांनी आपली खंत व्यक्त केली. खेड्याला मध्यवर्ती ठेवून शिक्षणाचे धोरण राबविले पाहिजे. केवळ अक्षराला ज्ञान समजून निरक्षर आदिवासींना ‘अडाणी’ समजण्याची चूक आपण करून बसलो असल्याचे ते म्हणाले.

पॅकेज महत्त्वाचे, माणुसकी कोण शिकवणार?

आज आपल्या मुलाला किती पॅकेज आहे हे वडील अभिमानाने सांगतात. मुलाला एटीएम मशीन बनविताना त्याला ‘माणूस’ बनायचे शिकवता का? असा परखड सवाल राजन गवस यांनी उपस्थित केला. पूर्वीच्या काळात गोरगरिबांसाठी शिक्षणाची दारे उघडणारे शिक्षणमहर्षी होऊन गेले. आता मात्र शिक्षण सम्राट तयार होऊ लागले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Educationशिक्षणGadchiroliगडचिरोली