शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

समन्वयातून तोडगा काढणेच हिताचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2022 05:00 IST

कुठलेही वाद हे विनाकारण होत नसतात तर त्यामागे काही ना काही कारण असतेच. वादावरून वाद वाढत गेल्याने फिर्यादीसह आरोपीलाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी आर्थिक, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागण्यासोबतच अमूल्य वेळ वाया जातो. हे टाळण्यासाठी व निरंतर सलोख्याचे संबंध टिकवून ठेवण्यासाठी समन्वयातून तोडगा काढणेच हिताचे आहे, असे प्रतिपादन देसाईगंज न्यायालयाचे न्यायाधीश ए. आर. भडके यांनी केले. 

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : कुठलेही वाद हे विनाकारण होत नसतात तर त्यामागे काही ना काही कारण असतेच. वादावरून वाद वाढत गेल्याने फिर्यादीसह आरोपीलाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी आर्थिक, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागण्यासोबतच अमूल्य वेळ वाया जातो. हे टाळण्यासाठी व निरंतर सलोख्याचे संबंध टिकवून ठेवण्यासाठी समन्वयातून तोडगा काढणेच हिताचे आहे, असे प्रतिपादन देसाईगंज न्यायालयाचे न्यायाधीश ए. आर. भडके यांनी केले. देसाईगंज येथील न्यायालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शनिवारी आयोजित लोक न्यायालयात मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी पॅनल प्रमुख ॲड. मो. तारीक सौदागर, सामाजिक कार्यकर्ता पुरुषोत्तम डेंगानी, ज्येष्ठ अधिवक्ता संजय गुरु, ॲड. ज्युईली व्ही. मेश्राम, ॲड. दत्तू पिलारे, ॲड. लाँगमार्च खोब्रागडे आदी उपस्थित होते.समाजाचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी निकोप वातावरण निर्मिती अत्यावश्यक आहे. सद्भावनेने वागल्यास असे वातावरण निर्माण करणे शक्य आहे, असे अधिवक्ता संजय गुरु यांनी सांगितले. यावेळी न्यायालयीन सभागृहात आयोजित लोक न्यायालयात अनेक प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. यशस्वीतेसाठी लघुलेखक संजय मुन, वरिष्ठ लिपीक उमेश सुपराळे, मुकेश कावळे, अधीक्षक अनिल आमटे, विधी सेवा समितीचे वरिष्ठ लिपिक रवी माणुसमारे, प्रवीण मेश्राम, डि. व्ही. महाजन, आर.पी.कामटकर, व्हि. टी. नंदगीरवार, टि .के.चालुरकर, देवदत्त सहारे, राकेश बिरा व इतर न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

टॅग्स :Lokadalatलोकअदालत