शहरं
Join us  
Trending Stories
1
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
4
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
5
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
6
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
7
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
8
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
9
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
10
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
11
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
12
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
13
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
14
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
15
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
16
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
17
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
18
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
19
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
20
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी

काेटापल्लीत मूलभूत साेईसुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 4:36 AM

ग्रामीण भागात किती प्रमाणात विकास झाला. याची वास्तविकता दुर्गम गावात गेल्यानंतर दृष्टीस पडते. अविकसित व मागासलेपणाचा ठपका या ...

ग्रामीण भागात किती प्रमाणात विकास झाला. याची वास्तविकता दुर्गम गावात गेल्यानंतर दृष्टीस पडते. अविकसित व मागासलेपणाचा ठपका या भागाला लागला आहे. कोटापल्ली गावात अजूनपर्यंत शासनाच्या सोयीसुविधा पोहोचल्या नाही. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावातील समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने शिवाय लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केले. शासन व प्रशासन लोकप्रतिनिधींनी गावाच्या विकासाकडे तोंड फिरविल्याने हाक कुणाला द्यावी, असा प्रश्न कोटापल्ली ग्रामस्थांना पडला आहे. स्वातंत्र्याच्या ७१ वर्षानंतरही गावात पक्के रस्ते, सिमेंट काँक्रीट नाल्या, विहिरी तसेच नळ योजना यासह अन्य विकासकामे न झाल्याने गावकऱ्यांना आहे तसेच जीवन जगावे लागत आहे. येथे नळ योजना नसल्याने हातपंपाच्या पाण्यावरच नागरिकांना तहान भागवावी लागते. उन्हाळ्यात जलस्त्रोताची पातळी खालावते. त्यामुळे पाण्यासाठीही भटकंती होते. नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी नळ योजना कार्यान्वित होणे आवश्यक आहे. तसेच दळणवळणाची साधने उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी कोटापल्लीकडे जाणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.