शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

शहरवासीयांना दाखल्यांसाठी भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:46 PM

नगर परिषद व नगर पंचायतीतून नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांसाठीच्या शुल्कात प्रचंड प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ मे पासून लागू होणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी केवळ २० रुपयात मिळणाºया दाखल्यांसाठी आता ४०० ते ५०० रुपये मोजावे लागणार आहेत.

ठळक मुद्दे१ मे पासून अंमलबजावणी : जन्म दाखल्यासाठी ४०० तर मृत्यू दाखल्यासाठी २ हजार रुपये मोजावे लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नगर परिषद व नगर पंचायतीतून नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांसाठीच्या शुल्कात प्रचंड प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ मे पासून लागू होणार आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी केवळ २० रुपयात मिळणाºया दाखल्यांसाठी आता ४०० ते ५०० रुपये मोजावे लागणार आहेत.जिल्ह्यातील कर निर्धारक समितीची ४ एप्रिल रोजी बैठक पार पडली. या बैठकीत नगर परिषद, नगर पंचायतींचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. तसेच सर्व नगर पंचायत क्षेत्रात एकच शुल्क आकरण्यात यावे, याबाबतही चर्चा झाली. त्यानुसार शुल्कात वाढ करण्यात आली आहे. शुल्कवाढीबाबत नागरिकांचा काहीही आक्षेप नसता, मात्र जुन्या दराच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. यापूर्वी २० रुपयांत मिळणाºया दाखल्यासाठी आता ४०० ते ५०० रुपये आकारले जाणार आहेत.यापूर्वी गडचिरोली नगर परिषदेत जन्म व मृत्यूचा दाखला केवळ २० रुपयांना मिळत होता. आता जन्म दाखल्यासाठी ४०० रुपये तर मृत्यू दाखल्यासाठी २ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. थकबाकी नसल्याचा दाखला ५०० रुपयांना मिळत होता. आता ६०० रुपये झाला आहे. व्यवसाय नाहरकत प्रमाणपत्र ५०० रुपयांना मिळत होता. तो आता ६०० रुपये केला आहे. विवाह नोंदणी दाखला ७०० रुपयांना मिळत होता. तो आता २ हजार रुपये केला आहे. रहिवासी दाखला २० रुपयांना मिळत होता. तो आता ६०० रुपये केला आहे. वीज जोडणीबाबतची एनओसी दाखला ५०० रुपयांना मिळत होता. तो आता ६०० रुपये केला आहे.अत्यावश्यक दाखल्यांवर वाढले २५ पटीने शुल्कजन्म, मृत्यू, रहिवासी दाखला हा प्रत्येक नागरिकाला घ्यावाच लागतो. कितीही गरीब असला तरी प्रशासकीय कामासाठी या दाखल्यांची गरज भासते. ही बाब लक्षात घेऊन या तिन्ही दाखल्यांसाठी यापूर्वी केवळ २० रुपये शुल्क आकारले जात होते. नवीन नियमात आता जन्म दाखल्यासाठी ४००, मृत्यू दाखल्यासाठी २ हजार व रहिवासी दाखल्यासाठी ६०० रुपये गडचिरोलीवासीयांना मोजावे लागणार आहेत. हा सर्वसामान्य व गरीब नागरिकांवर लादलेला भुर्दंड आहे. या दाखल्यांचे शुल्क २५ पटीने वाढविले आहे. तर दुसरीकडे विद्युत जोडणी दाखला, व्यवसाय नाहरकत दाखला यांच्या शुल्कात नाममात्र वाढ केली आहे. या दोन्ही दाखल्यांची मागणी करणाºया व्यक्तींची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण चांगली राहत असल्याने त्यांच्याकडून अधिकचा शुल्क आकारण्यास काहीच हरकत नाही. मात्र या उलट घडले आहे.नागरिकांवर आकारलेले दाखल्यांसाठीचे शुल्क अवास्तव व अन्यायकारक आहेत. मृत्यू दाखला एखाद्या गरीब व्यक्तीला आवश्चयक असल्यास तो कुठून २ हजार रुपये आणणार, असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे, जन्म, मृत्यू व रहिवासी दाखला यांच्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क कमी करावे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून मागणी केली आहे.- संजय मेश्राम, नगरसेवक नगर परिषद गडचिरोली