शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
3
शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
4
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
5
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?
7
पुण्याच्या मैदानात Mitchell Santner ची हवा; पहिल्या डावात टीम इंडियानं केल्या फक्त १५६ धावा
8
Reliance Bonus Share : Reliance Industries देतेय एकावर एक शेअर फ्री; गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा
9
“आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंनी स्वतः उभे राहावे किंवा जय शाहांनाच आणावे”: संजय राऊत
10
जळगावमध्ये गेल्या विधानसभेत विरोधात, आता सोबत करताहेत प्रचार
11
Girish Mahajan : "सर्व बंडखोरांची समजूत घालू, जिल्ह्यात एकाही ठिकाणी बंडखोरी होणार नाही"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
13
अजित पवारांचा धूमधडाका; भाजपाच्या ३ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारीही केली जाहीर
14
बापरे! बँकेच्या लॉकरमधून ४० लाखांचे दागिने गायब; फोन येताच महिलेला बसला मोठा धक्का
15
पोलीस कर्मचारी क्रिकेट खेळण्यात व्यस्त, इकडे चौकीतून हातकड्यांसह चोरट्याने काढला पळ
16
"...'तेव्हा' यांनी किती खोके दिले होते, हे मला माहीत आहे"; अमित ठाकरेंचा उद्धव-आदित्यचं नाव न घेता टोला!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण
18
जास्वंदीत घाला 'हे' घरगुती खत; येत्या संकष्टीपर्यंत बाप्पासाठी मिळतील परडीभर फुलं!
19
EPFO मध्ये मोठ्या बदलांची तयारी, अधिक बचतीचा मार्ग होणार मोकळा, सरकारचा हेतू काय?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा

होऊन जाऊ द्या शेवगा मसाला; १३० वरून आता ६० रुपयांवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2022 9:09 PM

Gadchiroli News काही दिवसांपूर्वी १२० ते १३० रुपये प्रतिकिलाेने विक्री केल्या जाणाऱ्या शेवग्याच्या शेंगा आता ६० ते ७० रुपये प्रतिकिलाेने विक्री केल्या जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देकारले व भेंडी खातेय भाव टोमॅटो, वांगी व काेथिंबीरचे दर घसरले

गडचिराेली : रब्बी हंगामात लागवड केलेल्या भाजीपाल्याचे उत्पादन निघण्यास सुरुवात झाल्याने बऱ्याच प्रकारचा भाजीपाला स्वस्त झाला आहे. याशिवाय शेवग्याच्या शेंगा सुद्धा बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी १२० ते १३० रुपये प्रतिकिलाेने विक्री केल्या जाणाऱ्या शेवग्याच्या शेंगा आता ६० ते ७० रुपये प्रतिकिलाेने विक्री केल्या जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

शेवग्याच्या शेंगा भाजीसाठी वापरता येतात. तसेच अनेकजण शेवगा मसालासुद्धा तयार करतात. परंतु, अधिक दर राहिल्यास शेवगा मसाल्याची भाजी करणे परवडत नाही. परंतु, आता शेवग्याच्या शेंगाचे दर घसरले आहेत. त्यामुळे चटपटीत असा शेवगा मसाला तयार करण्यासाठी अनेकजण शेंगा खरेदी करून जात असल्याचे दिसून येते. सध्या टोमॅटो व वांग्याचेही दर कमी झाले आहेत. १० ते १५ रुपये प्रतिकिलाे टोमॅटो तसेच २० ते २५ रुपये प्रतिकिलाे वांगी बाजारात मिळत आहेत. विशेष म्हणजे कारले व भेंडीचे दर अद्यापही फारसे घसरले नाही. कारले ५० ते ६० रुपये, तर भेंडी ४० ते ५० रुपये प्रतिकिलाेने विक्री केली जात आहे.

म्हणून शेवगा स्वस्त

गडचिराेली जिल्ह्यात शेवग्याच्या शेंगाचे उत्पादन फारसे हाेत नाही. माेजकेच शेतकरी परसबागेत, तसेच शेताच्या बांधावर शेवग्याचे उत्पादन घेतात. सध्या शेंगाचे उत्पादन निघण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेवग्याच्या शेंगा स्वस्त झाल्याचे दिसून येत आहे.

लिंबाची मागणी अन् भाव दोन्ही वाढले

सध्या विविध प्रकारचे समारंभ सुरू झाल्याने लिंबाची मागणी वाढली आहे. जिल्ह्यात लिंबाचे उत्पादन कमी प्रमाणात हाेत असल्याने बाजारपेठेत आवक कमी हाेते. त्यामुळे अधिक दराने लिंबाची विक्री केली जाते. दहा रुपयांत दाेन नग अशा पद्धतीने विक्री सुरू आहे.

पालेभाज्या महाग

रब्बी हंगामात लागवड केलेल्या पालेभाज्यांचे पीक निघाले. आता शेतकऱ्यांकडे पालेभाज्या शिल्लक नाही. तसेच उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने अनेकजण आता पालेभाज्या लागवड करीत आहेत.

आम्ही आठवड्यातून अनेक दिवस भाजीपाल्याचा वापर करताे. त्यामुळे भाजीपाला महाग झाला असला तरी खरेदी करावेच लागते. सध्या टोमॅटो व वांगी स्वस्त झाले आहेत. त्यामुळे वांगी खरेदीकडे अधिक कल आमच्या कुटुंबातील सदस्यांचा आहे. भाव पाहूनच खरेदी सुरू आहे.

- सुनीता गजबे, गृहिणी

टॅग्स :foodअन्न