शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
2
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
3
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
4
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
5
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
6
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
7
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
8
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
9
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
10
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
11
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
12
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
13
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
14
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
15
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
16
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
17
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
18
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
19
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
20
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?

पोलीस अधीक्षकांच्या बदलीने दारूबंदीच्या कामावर परिणाम होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2016 1:47 AM

१९९२ मध्ये दारूबंदी झालेल्या गडचिरोली जिल्ह्यात आजवर कोणत्याही पोलीस अधीक्षकाने गंभीरपणे अवैध दारू विक्री

गडचिरोली : १९९२ मध्ये दारूबंदी झालेल्या गडचिरोली जिल्ह्यात आजवर कोणत्याही पोलीस अधीक्षकाने गंभीरपणे अवैध दारू विक्री रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या नव्हत्या. या कामात पुढाकार घेणारे संदीप पाटील हे पहिले पोलीस अधीक्षक ठरले. त्यांनी अवैध दारू विक्री विरोधात प्रचंड कंबर कसली होती. शिवाय पोलीस दलालाही व्यसनमुक्त करण्याच्या कामाला चालना दिली होती. राज्य सरकारने बुधवारी राज्यातील पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात. यात संदीप पाटील यांची सातारा येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. पाटील यांच्या जागेवर सातारा येथून अभिनव देशमुख हे पोलीस अधीक्षक म्हणून गडचिरोलीला येणार आहेत. गडचिरोली येथे दोन वर्षापूर्वी पोलीस अधीक्षक म्हणून येण्यास राज्यातील अधिकारी तयार होत नसल्याने तत्कालीन गृहमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी संदीप पाटील यांना येथे रूजू होण्यास सांगितले. पाटील यांनी आपल्या काळात नक्षल चळवळीला नियंत्रणात आणण्यात प्रचंड प्रमाणात यश मिळविले. गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात सर्वाधिक नक्षल आत्मसमर्पण त्यांनी घडवून आणले. नक्षल चळवळीचा शस्त्राने व सामाजिकस्तरावर मुकाबला करण्याचे काम पोलीस दलाच्या माध्यमातून त्यांनी हाती घेतले. अनेक लोकोपयोगी उपक्रम गडचिरोली पोलीस दलाने विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून जिल्ह्यात राबविले. दुर्गम व अतिदुर्गम भागात पोलीस ठाण्याचा विस्तार, आत्मसमर्पीत नक्षलवाद्यांसाठी स्वतंत्र वसाहत निर्माण करण्याची कल्पना पाटील यांनी प्रत्यक्षात आणली. १ एप्रिल २०१५ रोजी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक अवैध दारू विक्री विरोधात त्यांनी गठीत केले. कढोली व अन्य भागातही महिलांचे मेळावे घेऊन दारूबंदीच्या कामाला लोकचळवळीचे स्वरूप दिले. महाराष्ट्र शासनाने संदीप पाटील यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्तीचा पुरस्कार देऊन सन्मानित केले. या पुरस्कारामुळे प्रेरणा घेऊन पाटील यांनी पोलीस कर्मचाऱ्यांमधील वाढती व्यसनाधिनता रोखण्यासाठी व्यसनमुक्तीचा खास कार्यक्रम हाती घेतला. संदीप पाटील यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल लोकमत वृत्तपत्र समुहानेही घेऊन त्यांना महाराष्ट्रीयन आॅफ दी इयर (विभागीय प्रशासकीय सेवा) हा पुरस्कार देऊन मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित केले. संदीप पाटील यांच्या बदलीमुळे व्यसनमुक्ती व अवैध दारू विक्री विरोधातील कारवायांना आता लगाम बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलीस दलाचे अनेक अधिकारी हे काम पोलिसांचे नाही, अशा मानसिकतेत राहतात. याचा अनुभव आजवर आलेला आहे. मात्र पाटील याला अपवाद ठरले होते. त्यांनी नक्षल चळवळीलाही काबूत ठेवण्यात यश मिळविले. (जिल्हा प्रतिनिधी)