शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

ध्यानातून मानसिक स्वास्थ्य लाभते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 12:59 AM

ध्यान केल्यामुळे माणसाला शारीरिक व मानसिक स्वास्थ लाभते. शिवाय जीवनात आनंद व शांतीचा अनुभव येतो. त्यामुळे प्रत्येकाने ध्यान व प्रार्थना नियमितपणे करून आपले जीवन निरोगी करावे,......

ठळक मुद्देकुलगुरूंचे प्रतिपादन : साई मंदिरातील शिबिराचा अनेकांनी घेतला लाभ

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : ध्यान केल्यामुळे माणसाला शारीरिक व मानसिक स्वास्थ लाभते. शिवाय जीवनात आनंद व शांतीचा अनुभव येतो. त्यामुळे प्रत्येकाने ध्यान व प्रार्थना नियमितपणे करून आपले जीवन निरोगी करावे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी केले.श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून रेडीगोडाऊन जवळील साई मंदिराच्या प्रांगणात तीन दिवशीय नि:शुल्क सहज ध्यान साधना शिबिर हार्टफुलनेस तर्फे नुकतेच पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. भुसारी, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर आकोजवार, प्रशिक्षक प्राचार्य लता पार्लेवार, उमेश पटेल, कार्यक्रमाचे आयोजक चंद्रशेखर भडांगे, प्रकाश ताकसांडे, शंकर मुस्कुटे, विनायक उईके आदी उपस्थित होते.यावेळी डॉ. सुधीर आकोजवार म्हणाले, धकाधकीच्या जीवन पध्दतीमुळे मानवी जीवन बदलत चालले आहे. पर्यावरण व निसर्गाच्या असंतुलामुळे माणसाच्या शारीरिक व मानसिक स्वास्थावर दुष्परिणाम झाले आहे. हे दुष्परिणाम नष्ट करण्यासाठी प्रत्येकाने नियमित ध्यान करणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा प्रकारचे शिबिर होणे गरजेचे आहे, असे सांगितले.प्राचार्य लता पार्लेवार व उमेश पटेल यांनी शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांना ध्यान साधनेचे प्रात्यक्षिक करून दाखविले. प्रास्ताविक चंद्रशेखर भडांगे यांनी केले तर संचालन व आभार प्रकाश ताकसांडे यांनी मानले. सदर शिबिराचा नागरिकांनी लाभ घेतला.