शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
4
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
5
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
6
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
7
टेबल फॅन खूपच खराब झालाय... स्वच्छ करण्यासाठी वापरा 'ही' सोपी पद्धत, चमकेल नव्यासारखा
8
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
9
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
10
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
11
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
12
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
13
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
14
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
15
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
16
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
17
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
18
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
19
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
20
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी

मी धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम शपथ घेतो की...; चौथ्यांदा मंत्री

By संजय तिपाले | Updated: July 2, 2023 15:57 IST

पुन्हा एकदा अहेरीच्या राजघराण्याकडे सत्तासूत्रे.

संजय तिपाले, गडचिरोली: जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार व आदिवासींचे नेते धर्मरावबाब आत्राम हे अजित पवार यांच्यासोबतच्या बंडात सहभागी आहेत. २ जुलै रोजी त्यांनी अजित पवारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. मी धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम ईश्वरसाक्ष शपथ घेतो की... असे शब्द त्यांनी उच्चारताच कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. त्यांनी यापूर्वी तीननवेळा राज्यमंत्रीपद भूषविले होते. आता कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेऊन त्यांनी चौथ्यांदा मंत्रिमंडळात समावेश एंट्री केली आहे.  

ग्रामपंचायत सदस्य ते राज्याचे कॅबिनेट मंत्री असा धर्मरावबाबा यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास आहे. अहेरीच्या आत्राम राजघराण्यातून आलेल्या धर्मरावबाबांनी राजकीय, सामाजिक जीवनात कायम संघर्ष केला. १९७५ मध्ये अहेरी ग्रामपंचायातचे सदस्य म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर १९८० मध्ये पंचायत समिती सभापतीपदी विराजमान झाले. पुढे १९९० मध्ये पूर्वीच्या सिरोंचा मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर १९९९, २००४ व २०१९ मध्ये ते आमदार झाले. त्यांनी यापूर्वी तीनवेळा राज्यमंत्रिपद भूषविले हाेते, आता ते नव्या राजकीय सत्तासमीकरणात भाजप- शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या सरकारमध्येही त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. पहिल्या पाच मंत्र्यांमध्ये त्यांनी शपथ घेतली. धर्मरावबाबांची मंंत्रिमंडळात वर्णी लागताच इकडे गडचिरोलीत जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, युवक जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांच्यासह समर्थक व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

लोकसभेच्या तोंडावर मिळाली उभारी

धर्मरावबाबा आत्राम यांनी गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केलेली आहे. आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे, पण तो राष्ट्रवादीला सोडविण्यासाठी त्यांनी ताकद पणाला लावली होती, शिवाय सर्व पर्याय खुले ठेवले होते. मात्र, नव्या राजकीय घडामोडीत त्यांनी अजित पवारांच्या गटासह मंत्रिपदाची शपथ घेतली. ते लोकसभा कोणत्या पक्षाकडून लढतील, हे अनिश्चित आहे, पण त्यापूर्वी मंत्रिपदी वर्णी लागल्याने त्यांच्या नेतृत्वाला उभारी मिळाल्याची चर्चा कार्यकर्त्यांत आहे.राजघराण्याची परंपरा कायम

आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले ते राजघराण्याच्या माध्यमातूनच. यापूर्वीच्या सरकारमध्ये धर्मरावबाबा आत्राम यांचे पुतणे अम्ब्रीशराव आत्राम मंत्री होते. अम्ब्रीशरावांना पराभूत करुन दहा वर्षांनंतर विधानसभेत पोहोचलेल्या धर्मरावबाबांना मंत्रिपद मिळाल्याने अहेरी व राजघराण्याच्या राजसत्तेची परंपरा कायम राहिली आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली