शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

निर्भया पथक झाले अलर्ट; रात्री शहरात गस्ती वाढल्या !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 1:53 PM

Gadchiroli : महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या; महिलांना सुरक्षा प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जानेवारी २०२२ मध्ये दिल्ली येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये निर्भया पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाचे काम मागील काही दिवसात सुस्तावले होते. मात्र राज्यात अलीकडे घडत असलेल्या घटनांमुळे जिल्ह्यातील निर्भया पथके अलर्ट झाली आहेत.

दिल्ली येथे एका युवतीवर बसमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे सारे समाजमन सुन्न झाले होते. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली होती. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेला आला. महिलांना सुरक्षा प्रधान करण्यासाठी प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये निर्भया नावाने महिला पोलिस अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्याचे निर्देश शासनाने दिले.

काय आहे निर्भया पथक? प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये निर्भया नावाने पोलिस अधिकाऱ्याचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकात एक पोलिस अधिकारी व काही महिला पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे. जिल्हास्तरावर व मोठ्या शहरांमध्ये या पथकाचे विशेष महत्त्व आहे. गस्त घालून महिला व बालकांना संरक्षण प्रदान केले जाते.

निर्भया पथकाचे काम कोणते? ज्या ठिकाणी महिला किंवा मुलींचा वावर असतो अशा ठिकाणी निर्भया पथक गस्त घालत असते. या प्रामुख्याने शाळा-महाविद्यालये, ट्युशन क्लासेस, एखाद्या ठिकाणी महिलांची काम करण्याची जागा यांचा समावेश आहे. या पथकामुळे महिला किंवा मुलींना सुरक्षा प्रदान होण्यास मोठी मदत होते. पोलिस विभागावर इतरही कामांचा ताण आहे. त्यामुळे निर्भया पथकातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना इतर कामांची जबाबदारी सोपविली जाते. त्यामुळे गस्तीकडे दुर्लक्ष होते.

मध्यंतरी काम सुस्तावले जानेवारी २०२२ मध्ये दिल्ली येथे घडलेल्या घटनेनंतर निर्भया पथकाची निर्मिती करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार पथके तयार करण्यात आली होती. मात्र या पथकाचे काम सुस्तावले होते. तालुकास्तरावर असलेल्या पोलिस स्टेशनमध्ये तर हे पथक नाहीच्या बरोबरच होते. या पथकाकडे इतर कामांची जबाबदारी सोपवली होती

या ठिकाणी विशेष लक्ष महिलांना सुरक्षा प्रदान करणे हे पथकाचे सर्वांत महत्त्वाचे काम आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी महिलांचा वावर असते. त्या ठिकाणी सदर पथक गस्त घालत असते. प्रामुख्याने शाळा, महाविद्यालये, ट्युशन क्लासेस, बसस्थानक यांचा समावेश आहे. मोठ्या शहरांमध्ये रात्र पाळीत कारखान्यांमध्ये काम चालते. त्या ठिकाणी सुटी होण्याच्या वेळी निर्भया पथक तैनात असते.

सातत्य राहणार काय? राज्यात महिला अत्याचाराची एखादी घटना घडल्यानंतर पोलिस विभागाला निर्भया पथकाची जाणीव होते. इतर वेळेवर मात्र या पथकाचा विसर पडते. पोलिस विभाग अलर्ट राहत नसल्याने याचा गैरफायदा समाजकंठकांकडून घेतला जाते. त्यांच्याकडून अत्याचाराची घटना घडून येत असल्याचे दिसन येते. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली