शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

बँकेसाठी अद्यापही करावा लागतो ५० किमी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 2:51 PM

नागरिकांचे हाल : १२ लाख लोकसंख्येसाठी १३० शाखा

दिगांबर जवादेलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रत्येक गावापर्यंत बँकसेवा पोहोचली पाहिजे, हे धोरण आहे. मात्र जिल्ह्यातील नागरिकांना बँक सेवांसाठी ५० किमीचे अंतर गाठावे लागत असल्याचे वास्तव आहे. शहरांमध्ये बँकांची गर्दी होत असताना ग्रामीण व दुर्गम भागात मात्र बँकसेवा पोहोचली नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकांचे बँक खाते कसे निघणार, असा प्रश्न आहे.

जिल्ह्याची लोकसंख्या १२ लाखांच्यावर आहे. बँकांची संख्या मात्र केवळ १३० एवढी आहे. त्यातही काही तालुक्यांमध्ये योजनांची संख्या नगण्य आहे. शासकीय योजनांचे पैसे आता बँक खात्यातच जमा करण्याचे धोरण शासनाने सुरू केले आहे. जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचे उत्पन्न कमी असल्याने येथील नागरिक शासकीय योजनांसाठी पात्र ठरतात. मात्र त्यांच्यापर्यंत बँक सेवाच पोहोचत नसल्याचे वास्तव आहे. बँकेचा खाता असला तरी ५० किमी अंतर सायकलने जाऊन त्यातील पैसे काढणे अनेकांना व्यावहारिक वाटत नाही. तालुकास्थळी असलेल्या बँकेचे व्यवहार करण्यासाठी एक दिवसाच्या मुक्कामाने जावे लागते.

प्रत्येक शासकीय योजनेच्या लाभासाठी बँक खाते आवश्यक आहे. मात्र, अनेक लाभार्थ्यांकडे बँक खाते नसल्याने ते योजनेसाठी पात्र ठरत नाही. एटापल्ली, भामरागड, सिरोंचा या तालुक्यांमध्ये तर बोटावर मोजण्याएवढ्या बँकेच्या शाखा आहेत.

बीसी चांगला उपाय मात्र संख्या वाढवावीबँकेची शाखा स्थापन करून ती चालविण्यासाठी महिन्याला लाखो रूपये खर्च होतात. त्यामुळे आर्थिक उलाढाल कमी असलेल्या ठिकाणी बँक शाखा स्थापन करणे व्यावहारिक नाही. त्यासाठी व्यावसायिक प्रतिनिधी (बीसी) हा एक चांगला पर्याय आहे. बँक एखाद्या व्यक्तीला व्यावसायिक प्रतिनिधी नेमते. तो व्यक्ती बँकेचे व्यवहार दुचाकीने गावात जाऊन पूर्ण करते. आर्थिक उलाढालीनुसार त्याला बँक कमिशन देते. बीसी हा बँकेचा व्यवहार करीत असल्याने त्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. यातून नागरिकांना गावातच बँकसेवा मिळेल. तसेच युवकांना रोजगार मिळेल.

गाव तेथे रस्त्याची प्रतीक्षा

  • एटापल्ली, भामरागड, सिरोंचा या तालुक्यांमध्ये अजूनही अनेक गावांचा पावसाळ्यात चार महिने संपर्क तुटलेला असतो. देश चंद्रावर यान पाठवत असताना गावात मात्र जायला रस्ता नाही.
  • जवळच्या नाल्यावर पूल नाही. परिणामी गर्भवती महिलेला किवा आजारी व्यक्तीला खाटेने रुग्णालयात दाखल करावे लागते.

 

बीसींची संख्या वाढविण्याचे निर्देश आरबीआयने बँकांना दिले आहेत. बीसीच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार प्राप्त होईल. बहुतांश बँका बीसीची नियुक्ती करतात. बीसीच्या रोजगारासाठी युवकांनी बँकांशी संपर्क साधावा, बीसीमुळे गावातच बँकसेवा मिळण्यास मदत होईल.- प्रशांत धोंगळे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली