शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

केवळ २२ घरकूल पूर्ण

By admin | Published: June 08, 2016 1:11 AM

इंदिरा आवास योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात सन २०१५-१६ या वर्षात एकूण ४ हजार ८६८

गडचिरोली : इंदिरा आवास योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात सन २०१५-१६ या वर्षात एकूण ४ हजार ८६८ घरकूल मंजूर करण्यात आले. यापैकी आतापर्यंत केवळ २२ घरकूल पूर्ण झाले आहेत. तर तब्बल ४ हजार ८४६ घरकूल अपूर्णावस्थेत आहेत.सर्वसामान्य व गरीब नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी राज्य शासनाने इंदिरा आवास योजना सुरू केली. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी ४ हजारावर घरकूल मंजूर केले जातात. मात्र आर्थिक वर्ष संपल्यानंतरही घरकुलांचे काम १०० टक्के पूर्ण होत नाही, असा अनुभव दरवर्षी येतो. सन २०१५-१६ या वर्षात ३१ मार्च पूर्वी एकूण ४ हजार ८६८ घरकूल मंजूर करण्यात आले. यामध्ये अहेरी तालुक्यात १ हजार ९३, आरमोरी तालुक्यात २११, भामरागड १५१, चामोर्शी ७७८, देसाईगंज ७६, धानोरा ४२३, एटापल्ली १५२, गडचिरोली ७०३, कोरची २७३, कुरखेडा ४४०, मुलचेरा २९० व सिरोंचा तालुक्यातील २७८ घरकुलांचा समावेश आहे. जिल्ह्यात मार्च अखेरपासून घरकुलांचे बांधकाम सुरू करण्यात आले. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ४ हजार २८३ घरकुलांचे काम सुरू झाले आहेत. यापैकी ५८५ घरकूल लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे अनुदान अदा करण्यात आले आहे. तर ७०९ लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचे अनुदान अदा करण्यात आले. सद्य:स्थितीत पूर्ण झालेल्या २२ घरकुलांमध्ये गडचिरोली तालुक्यातील २०, धानोरा १ व मुलचेरा तालुक्यातील एका घरकुलाचा समावेश आहे. अद्यापही ४ हजार ८४६ घरकूल अपूर्णस्थितीत आहेत. ७०९ घरकुलांचे काम स्लॅबस्तरापर्यंत पोहोचले आहेत. यामध्ये अहेरी तालुक्यातील तीन, आरमोरी तालुक्यातील ७६, भामरागड तालुक्यातील १३, चामोर्शी तालुक्यातील ४६, देसाईगंज तालुक्यातील ३०, धानोरा ६२, गडचिरोली ३५६, कोरची ६१, कुरखेडा ६० व सिरोंचा तालुक्यातील दोन घरकुलांचा समावेश आहे. (स्थानिक प्रतिनिधी)५८५ घरकुलांना प्रारंभ नाही४जिल्हाभरात एकूण ४ हजार ८६८ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. यापैकी ४ हजार २८३ घरकुलांचे काम हाती घेण्यात आले. अद्यापही ५८५ घरकुलांच्या बांधकामांना प्रारंभच झाला नसल्याची माहिती डीआरडीएच्या सूत्रांकडून मिळाली आहे. या ५८५ घरकुलांमध्ये अहेरी उपविभागाच्या पाच तालुक्यातील घरकुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे दुर्गम भागातील घरकुलाचे काम अद्यापही हाती घेण्यात आले नाही. मात्र याकडे पंचायत समिती प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.१५ जून नंतर घरकुलांच्या कामाला लागणार ब्रेक४पावसाळ्याला सुरूवात झाली असून गडचिरोली जिल्ह्यात शनिवारी व रविवारी तसेच काही भागात सोमवारी वादळासह जोरदार पाऊस बरसला. यात स्लॅब स्तरावर पोहोचलेल्या घरकुलांचे नुकसान झाले. स्लॅब टाकून बाहेरील काम पूर्ण झालेल्या घरकुलाचे आतील काम पावसाळ्यातही करणे शक्य होणार आहे. मात्र जोता स्तरापर्यंत काम पोहोचलेल्या घरकुलाचे काम १५ जूननंतर पावसामुळे पूर्णत: बंद होणार आहे. या वर्षातही १०० टक्के घरकुलाचे काम पूर्ण होणे शक्य नाही.