शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सावधाना! डेंग्यू घराजवळच, आठ महिन्यांत जिल्ह्यात ७० वर रुग्ण

By दिलीप दहेलकर | Updated: August 28, 2023 14:02 IST

आराेग्य यंत्रणा अलर्ट : अहेरी व सिराेंचा तालुका संवेदनशील जाहीर

दिलीप दहेलकर

गडचिराेली : अस्वच्छता, घाण पाणी साचलेली डबकी, त्यात एडिस ईजिप्ती डासांची हाेणारी उत्पत्ती यामुळे पावसाळयात डेंग्यू आजाराची साथ अधिक पसरते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात याबाबत प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. दरम्यान, जानेवारी ते ऑगस्ट २०२३ या आठ महिन्यांच्या कालावधीत गडचिराेली जिल्ह्यात ७०पेक्षा अधिक डेंग्यूबाधित रुग्ण आढळून आले. विशेष म्हणजे अहेरी व सिराेंचा तालुक्याच्या दुर्गम भागात डेंग्यूबाधित रुग्णांची संख्या अधिक आढळली. त्यामुळे सदर दाेन तालुक्यांवर जिल्हा व तालुका आराेग्य यंत्रणेने लक्ष अधिक केंद्रित केले आहे.

चालू वर्षात ३० जुलैपर्यंत जिल्हाभरात एकुण ६७ रुग्ण डेंग्यूबाधित आढळून आले आहेत. मात्र या वर्षात डेंग्यूने एकाही बाधित रुग्णांचा मृत्यू झाला नाही. असे असले तरी जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्यासह जिल्हा आराेग्य अधिकारी व आराेग्य विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी अहेरी व सिराेंचा या दाेन्ही तालुक्यांच्या विविध संवेदनशील गावांना भेटी दिल्या. तेथील आराेग्याच्या बाबी व अडचणी जाणून घेतल्या. तसेच हिवताप व डेंग्यूबाबत अधिक सतर्क राहण्याच्या सूचना अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी दिल्या.

अशी घ्या काळजी

डेंग्यू हा किटकजन्य आजार असून तो विषाणूपासून पसरत असतो. डेंग्यू या आजाराचा प्रसार एडिस ईजिप्ती या डासापासून होत असतो. हा डास प्रामुख्याने दिवसा चावत असतो. या डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होत असते. त्यामुळे आपल्या घरातील कुंड्या, कूलर, रिकामे टायर, फ्रिजच्या मागे, घरावरील छतावर पाणी सात दिवसांपेक्षा जास्त पाणी साचणार नाही याबाबत सर्वानी दक्षता घ्यावी.

गावागावांत ताप सर्वेक्षण

आरोग्य विभागामार्फत डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी गावागावामध्ये ताप सर्वेक्षण आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत करण्यात येत आहे. तसेच किटकजन्य सर्वेक्षणामध्ये घरातील दूषित कंटेनर शोधून ते रिकामे केल्या जात आहे. तसेच तापच्या रुग्णावर वेळीच उपचार करून गंभीर आजाराच्या रुग्णांना वेळीच संदर्भ सेवा उपलब्ध करण्यात येत आहे. पंचायत विभागामार्फत ग्रामपंचायतीद्वारा धूर फवारणी, पिण्याचे पाण्याचे निर्जंतुकीकरण केल्या जात आहे.

वेळोवेळी घेतला जातोय आढावा

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह या वेळोवेळी सर्व विभागाच्या विभाग प्रमुखाची व्ही. सी.द्वारा आढावा घेऊन पावसाळ्याचे दिवस असल्याने प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्या याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. आरोग्य विभागासोबत इतर विभागांनी समन्वय साधून जिल्ह्यातील डेंग्यू मलेरिया या आजारावर नियंत्रणाकरिता प्रयत्न करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहे. नुकतेच त्यांनी सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, मोयाबीनपेठा येथे भेट देऊन आरोग्य विषयक बाबीचा आढावा घेतला.

डेंग्यू आजाराची लक्षणे ...

एकाएकी ताप येणे, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांच्या खोबणीत वेदना, सांधेदुखी, सर्वांग दुखणे, अंगावर पुरळ येणे, पोट दुखणे, भूक मंदावणे, उलट्या होणे, प्रसंगी उलट्यातून रक्त येणे, तोंडाला कोरड पडणे, नाकातोंडातून हिरड्यातून रक्तस्त्राव होणे, रक्त मिश्रित काळसर संडास होणे ही डेंग्यू तापाची लक्षणे आहेत.

तर... तातडीने गाठा रुग्णालय

डेंग्यूबाबतची लक्षणे आढळल्यास तत्काळनजीकच्या जिल्हा सामान्य रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन मोफत रक्ततपासणी करावी आणि औषधोपचार घ्यावे. तसेच आजाराला टाळण्याकरिता नागरिकांनी आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा. दर आठवड्याला घरातील पाण्याची भांडी रिकामे करून स्वच्छ घासून, पुसून कोरडी करावी, जुने टायर, नारळाचे टरफल, प्लास्टिकच्या वस्तू, पाणी साचू शकेल अशा फुटलेल्या बाटल्या अशा निरोपयोगी वस्तू घराभोवती साठू देऊ नका, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यdengueडेंग्यूGadchiroliगडचिरोली