शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

अर्धवट पुलामुळे बसला पुराचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 5:00 AM

आठवडाभरापासून अहेरी उपविभागात जोरदार पाऊस येत आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. यावर्षीच्या खरीप हंगामातील दोन महिने तुरळक पावसाने गेल्यानंतर ९ ऑगस्टपासून पावसाने जिल्ह्यात जोर धरला आहे. अहेरी उपविभागातील भामरागड तालुक्यात पूर परिस्थिती अद्यापही कायम आहे. अहेरी लगतच्या गडअहेरी नाल्यावर कमी उंचीचा पूल असल्याने या भागातील पुलावरून पाणी वाहत आहे.

ठळक मुद्देगडअहेरी नाल्याला भेट; परिसराच्या १२ गावातील संपर्क तुटला

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुका मुख्यालयाजवळ असलेल्या गडअहेरी नाल्यातून भरपूर पाणी वाहत असल्याने परिसराच्या १० ते १२ गावांचा संपर्क तुटला आहे. गडअहेरी येथील नाल्यावर कमी उंचीचा पूल आहे. त्यामुळे पावसाळ्यात दरवर्षी परिसरातील गावांचा संपर्क तुटतो. यावर्षीही त्याचा फटका बसला.आठवडाभरापासून अहेरी उपविभागात जोरदार पाऊस येत आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. यावर्षीच्या खरीप हंगामातील दोन महिने तुरळक पावसाने गेल्यानंतर ९ ऑगस्टपासून पावसाने जिल्ह्यात जोर धरला आहे. अहेरी उपविभागातील भामरागड तालुक्यात पूर परिस्थिती अद्यापही कायम आहे. अहेरी लगतच्या गडअहेरी नाल्यावर कमी उंचीचा पूल असल्याने या भागातील पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे परिसराच्या १० ते १२ गावातील संपर्क तुटला आहे. ही पूर परिस्थिती पाहण्यासाठी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी गडअहेरी नाल्यावर भेट देऊन माहिती जाणून घेतली.गडअहेरी नाल्यासह परिसरातील नाल्यांना पूर आल्याने या भागातील आवागमन बंद आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पूर परिस्थितीमुळे अत्यावश्यक कामासाठी बाहेर जाता येत नाही.कमी उंचीच्या पुलामुळे नागरिकांना मागील अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत आहे. नवीन पुलाचे काम झाल्याशिवाय समस्या दूर होणार नाही. या सर्व गंभीर समस्यांची माहिती जि. प. अध्यक्षांनी याप्रसंगी घेतली. यावेळी अहेरी येथील आदिवासी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :floodपूरRainपाऊस