शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
'या' विधानसभा मतदारसंघावरून भाजपमध्येच मोठं घमासान, मुनगंटीवार थेट दिल्ली गाठणार
3
विधानसभेसाठी भाजपाकडून उमेदवारांची निर्यात, हे पाच नेते महायुतीतील मित्रपक्षांकडून लढणार
4
Pratap Patil Chikhalikar: २० वर्षात चिखलीकरांनी पाचव्यांदा बदलला पक्ष, असा आहे इतिहास
5
"माझी लढाई त्यापेक्षा मोठी...", आदित्य ठाकरेंसोबतच्या तुलनेवर अमित ठाकरे थेट बोलले!
6
अरे देवा! मजुरी करून बायकोला शिकवलं, नोकरी लागल्यावर तिने नवऱ्यालाच सोडलं, म्हणाली...
7
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
8
इच्छुकांसोबत चर्चेदरम्यान मनोज जरांगेंच्या डोळ्यात तरळले अश्रू; २५ तास चालल्या मुलाखती
9
Stock Market Today : शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
10
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
11
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?
13
पुण्याच्या मैदानात Mitchell Santner ची हवा; पहिल्या डावात टीम इंडियानं केल्या फक्त १५६ धावा
14
Reliance Bonus Share : Reliance Industries देतेय एकावर एक शेअर फ्री; गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा
15
“आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंनी स्वतः उभे राहावे किंवा जय शाहांनाच आणावे”: संजय राऊत
16
जळगावमध्ये गेल्या विधानसभेत विरोधात, आता सोबत करताहेत प्रचार
17
Girish Mahajan : "सर्व बंडखोरांची समजूत घालू, जिल्ह्यात एकाही ठिकाणी बंडखोरी होणार नाही"
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
19
अजित पवारांचा धूमधडाका; भाजपाच्या ३ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारीही केली जाहीर
20
बापरे! बँकेच्या लॉकरमधून ४० लाखांचे दागिने गायब; फोन येताच महिलेला बसला मोठा धक्का

निकृष्ट बंधाऱ्याची पूर्ण रक्कम अदा

By admin | Published: June 12, 2016 1:14 AM

जिल्हा परिषद सिंचाई उपविभाग या विभागाकडून चंदनवेली येथे आदिवासी उपयोजनेंतर्गत जलशिवार योजना पाणी साठवण बंधारा बांधण्यात आला.

चंदनवेली येथील बंधारा : ग्रामपंचायतीचे दुर्लक्षएटापल्ली : जिल्हा परिषद सिंचाई उपविभाग या विभागाकडून चंदनवेली येथे आदिवासी उपयोजनेंतर्गत जलशिवार योजना पाणी साठवण बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ठ आहे. त्यामुळे क्वालिटी कंट्रोल विभागाकडून याची चौकशी करावी, अशी मागणी दीपक वैद्य यांनी केली आहे. चंदनवेली येथे बंधारा बांधकामासाठी १५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून बंधाऱ्याचे बांधकाम केले जात होते. बंधारा बांधताना ४० एमएम गिट्टी बाहेरून बोलावून ती वापरणे आवश्यक असताना कंत्राटदाराने ४० एमएम गिट्टी न वापरता बंधाऱ्याच्या आजुबाजुचे दगड जमा केले. ते खोदून बंधाऱ्याच्या बांधकामासाठी गिट्टी वापरली, असा आरोप दीपक वैद्य यांनी केला आहे. बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पाणी साठवून राहण्याकरिता गेट लावणे आवश्यक असते. तसेच हा गेट लावल्यानंतरच बांधकामाचा पूर्ण बिल काढणे आवश्यक असताना लोखंडी गेट न लावताच पूर्ण बिल देण्यात आले आहे. त्यामुळे या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. १५ लाख रूपयांच्या निधीपैकी प्रत्यक्ष पाच लाख रूपये सुध्दा खर्च झाले नसावेत, असा आरोप सुध्दा वैद्य यांनी केला आहे. यासाठी दोषी असलेल्या ग्रामसेवकावर कारवाई करावी, अशी मागणी दीपक वैद्य यांनी संवर्ग विकास अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे. बंधाऱ्याचे बांधकाम ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखाली करण्यात येत आहे. त्यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. मात्र ग्रामपंचायतीने स्वत: काम न करता ठेकेदाराला काम दिले. त्याच्यावरही नियंत्रण ठेवले नाही. त्यामुळे बंधारा निकृष्ठ दर्जाचा बांधण्यात आला. असाच प्रकार अनेक ठिकाणी झाला असून चंदनवेलीच्या कामात मोठा गैरव्यवहार झाला असून बांधकामाची चौकशी करण्याची मागणी दीपक वैद्य यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासणी करावीजिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाच्या मार्फतीने जिल्हाभर तलाव, बोड्या खोदकाम, दुरूस्ती तसेच बंधारे बांधणे आदी कामे अहेरी उपविभागात मोठ्या प्रमाणावर करण्यात आले आहेत. राजकीय लोकांशी संबंध असलेले कंत्राटदार हे काम करीत आहेत. दुर्गम व अतिदुर्गम भागात थातूरमातूर काम केली आहेत. भामरागड, एटापल्ली, अहेरी, मुलचेरा, सिरोंचा आदी तालुक्यात असा प्रकार झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी अकस्मात भेटी देऊन या सर्व कामांची पावसापूर्वी पाहणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. ग्रामसेवकाचा प्रतिक्रिया देण्यास नकारबंधारा बांधकामाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. त्यामुळे निकृष्ठ दर्जाच्या बंधाराबाबत गेदा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ई. एस. नारा यांना विचारणा केली असता, बंधाऱ्याच्या बांधकामाबाबत त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. यावरून बांधकामात घोळ असल्याचे स्पष्ट होत आहे.