शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
2
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
3
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
4
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
5
लाडकी बहीण योजना कधीपर्यंत चालणार? रक्कम किती वाढणार?; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती
6
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
7
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
8
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
9
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
10
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
11
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
12
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
13
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
14
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
15
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
16
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
17
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
18
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
19
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
20
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...

जिमलगट्टा तालुक्याची निर्मिती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 10:42 PM

अहेरी तालुका मुख्यालयापासून ६० किमी अंतरावर असलेल्या जिमलगट्टा तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी मागील पंधरा वर्षांपासून शासनाकडे केली जात आहे.

ठळक मुद्देपरिसरात ६७ गावांचा समावेश : नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

आॅनलाईन लोकमतजिमलगट्टा : अहेरी तालुका मुख्यालयापासून ६० किमी अंतरावर असलेल्या जिमलगट्टा तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी मागील पंधरा वर्षांपासून शासनाकडे केली जात आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्षच झाले. जिमलगट्टा परिसरातील नागरिकांना विविध शासकीय कामे करताना त्रास होत असल्याने या तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली.जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिमलगट्टाला भेट दिली असता, त्यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, जिमलगट्टा मंडळ कार्यालयांतर्गत जिमलगट्टा, वेडमपल्ली, उमानूर, मरपल्ली, रेगुलवाही, गोविंदगाव, किष्टापूर, देचली, पेठा, कोंजेड, रेनपल्ली, कमलापूर, राजाराम, खांदला, दामरंचा आदी ग्राम पंचायतीचा समावेश होतो.या मंडळ कार्यालयांतर्गत ६७ गावांचा समावेश असून ४० ते ५० हजार लोकसंख्या आहे. लोवा, कल्लेड, आसली, मुखानपल्ली येथील नागरिकांना १० ते १५ किमीची पायपीट करून बस पकडावी लागते. तालुका स्तरावरील कामे करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. यात नागरिकांना आर्थिक, मानसिक त्रास होतो.२००२ मध्ये जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील चार नवीन तालुक्याच्या निर्मितीचा ठराव सादर करून त्यास मंजुरी प्रदान करण्यात आली. परंतु अद्यापही ही मागणी शासनस्तरावर प्रलंबित आहे.